मराठा आरक्षण लढाईत विजय; 'अधिसूचना न्यायालयात टिकण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावे'

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 10:04 PM IST

thumbnail

पुणे Maratha Reservation :  मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईत विजय मिळवला असून, सगेसोयरे यांना देखील प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळं राज्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय. सरकारनं मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेचं आम्ही स्वागत करतो. मात्र, त्या अधिसूचनेत काही दुरुस्त्या आवश्यक आहेत. तसंच मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाई महत्त्वाची आहे. मराठा आरक्षणाची अधिसूचना न्यायालयात टिकावी यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे, अशी मागणी पुण्यातील मराठा आंदोलकांनी केलीय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण घेऊनच परतणार असल्याची घोषणा केली होती. अखेर ही घोषणा खरी ठरली. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ गावी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसंच गुलालाची उधळण करून पेढे वाटण्यात आले. यावेळी गावतील महिला देखील सहभागी झाल्या होत्या.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.