ETV Bharat / state

आरएसएसच्या 'कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय'चा नागपुरात शुभारंभ, वर्गातून एकात्मतेची अनुभूती - पराग अभ्यंकर - RSS Karyakarta Vikas Varg

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 4:38 PM IST

RSS Karyakarta Vikas Varg : आजपासून नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय'चा शुभारंभ झाला आहे. यावेळी सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपालजी, अ. भा. सेवा प्रमुख तसेच वर्गाचे पालक अधिकारी पराग अभ्यंकर तसेच वर्ग सर्वाधिकारी इकबाल सिंहजी उपस्थित आहेत. वर्गाचा समारोप १० जून २०२४ रोजी होणार आहे.

RSS Karyakarta Vikas Varg
कार्यकर्ता विकास वर्ग (Reporter)

नागपूर RSS Karyakarta Vikas Varg : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यंदाच्या कार्यकर्ता विकास वर्गात एकूण ९३६ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. देशभरातील प्रांतांमधून आलेल्या शिक्षार्थींना संबोधित करताना पराग अभ्यंकर म्हणाले, "संघ कार्य जाणून घेण्यासाठी आणि ते आचरणात आणण्यासाठी नागपूरला जाण्याचे सौभाग्य मिळावे असे प्रत्येक स्वयंसेवकाला वाटत असते. संघकार्य हे जीवनकार्य व्हावे, ही भावना स्वयंसेवकांच्या मनात कायम असते. ही भूमी डॉ. हेडगेवार आणि गुरुजींची तपोभूमी आहे. संघकार्यात प्रशिक्षण वर्गाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे संघाचे जसजसे काम वाढत गेले तसतसे विविध प्रांतांमध्ये प्रशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्यापूर्वी अनेक आव्हाने होती."

केवळ दोन वेळा प्रशिक्षण खंडित झाले : त्या काळात संघाने देशाच्या स्वातंत्र्यासाठीही काम केले. जंगल सत्याग्रहात डॉ. हेडगेवारांचा सक्रिय सहभाग घेतला होता. बंदीचा काळ आणि कोरोनाचा काळ वगळता संघाचे प्रशिक्षण वर्ग कधीही खंडित झाले नाहीत. काळानुरूप प्रशिक्षण वर्गाचा कालावधी आणि अभ्यासक्रम यात बदल करण्यात आला. कार्यकर्त्यांची विचारसरणी काय असावी, त्याच्यासमोरील आव्हाने काय आहेत हे लक्षात घेऊन व्यवस्थेत बदल करण्यात आले, असं पराग अभ्यंकर यांनी सांगितलं.

आव्हानं बदलली आहेत : पूर्वीच्या वर्गांमध्ये, शारीरिक कार्यक्रमांतर्गत संयम आणि धैर्य वाढविण्यावर भर दिला जायचा. आता आव्हानं बदलली आहेत. त्याचे संदर्भ समजून घेत या आव्हानांना उत्तर द्यायचे असल्याने तशा विषयांचाही या वर्गात समावेश करण्यात आला आहे. या वर्गातून संघटित हिंदू समाजाची जागतिक दृष्टी निर्माण व्हावी हा हेतू आहे. या वर्गात शिक्षार्थींना समाजातील सज्जन शक्तीशी जोडून आपली शक्ती कशी वाढवायची याचं व्यावहारिक प्रशिक्षण मिळणार आहे. संपर्ण भारतातून शिक्षार्थी या वर्गात सहभागी होतात. त्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होते. हिंदुत्वाच्या एकात्मतेचीही अनुभूती येथे होते, अशी माहिती पराग अभ्यंकर यांनी दिली.

हेही वाचा :

  1. पंतप्रधानांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल, काही रस्त्यांवर पार्किंगवर प्रतिबंध, कोणते आहेत पर्यायी रस्ते? - Mumbai traffic update
  2. बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार; पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठणार? - lok sabha election 2024
  3. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : आता मुंबई गुन्हे शाखा करणार भावेश भिंडेचा 'कसून' तपास, प्रकरण वर्ग - Ghatkopar Hoarding Collapse
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.