ETV Bharat / state

शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 8:16 PM IST

Students poisoned by milk : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना खुलताबाद तसंच वेरूळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शाळेच्या शिक्षकानं दिलीय.

Students poisoned by milk
विद्यार्थ्यांना दुधातून विषबाधा

छत्रपती संभाजीनगर Students poisoned by milk: जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास दूध देण्यात आल होतं. त्यानंतर काही वेळात मुलांना उलटी, मळमळ होण्यास सुरवात झाली. ही बाब लक्षात येताच काही मुलांना खुलताबाद येथील तर, जास्त त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यांना वेरुळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शालेय प्रशासनानं दिली आहे.

96 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली : तिसगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थी निवासी शिक्षण घेत असून शासनाकडून विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनाची सोय केली जाते. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 317 आबे, विद्यार्थ्यांना आश्रम शाळा प्रशासनाच्या वतीनं पिण्यासाठी दूध देण्यात आलं होतं. हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, जुलाब यासारखा त्रास जाणवू लागला. त्यामुळं काही विद्यार्थी अस्वस्थ झाले होते. संबंधित आदिवासी शाळा प्रशासनानं तातडीनं 96 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद तसंच काही विद्यार्थ्यांना वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची शाळेतील शिक्षकांनी दिलीय.

चौकशीची होत आहे मागणी : शाळेत देण्यात येणारा आहार, दूध शासनाच्या वतीनं देण्यात येतो. मंगळवारीदेखील मुलांना दुधाचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, अचानक विद्यार्थ्यांना त्रास झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. पुरवठादाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दूध पुरवठादारानं दूध ताजं दिलं होतं का? दूधात काही भेसळ होती का? असे प्रश्न आता निर्माण होत आहे. या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून करण्यात आली आहे.

हे वाचलंत का :

  1. शंभू सीमेवर गोंधळ, शेतकऱ्यांनी तोडले बॅरिकेड्स, अनेकजणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
  2. माजी भारतीय क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन, इरफान पठाणनं वाहिली श्रद्धांजली
  3. माजी भारतीय क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचं निधन, इरफान पठाणनं वाहिली श्रद्धांजली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.