ETV Bharat / state

गेल्या 50-60 वर्षांत काँग्रेसला करता आलं नाही ते मोदींनी केलं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 5:44 PM IST

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde : गेल्या दहा वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी जे देशासाठी काम केलं, ते गेल्या 50-60 वर्षांत काँग्रेसला करता आलं नाही. म्हणूनच या विकासाच्या कामावर खऱ्या अर्थानं देशाला विकासाकडे नेण्याचं काम, देशाला प्रगतीपथाकडे नेण्याचं नाव काम, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम, देशाला जगभरामध्ये मान-सन्मान प्राप्त करून देण्याचं काम मोदींनी केलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुंबई CM Eknath Shinde : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला खूप शुभेच्छा देतो. बाबासाहेबांनी आयुष्यभर दलितांना न्याय देण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी लिहिलेले संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. जगात बाबासाहेबांचे संविधान वाचले जात आहे. तसेच बाबासाहेबांच्या संविधानावरच आमचे सरकार स्थापन केले आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईतील चैत्यभूमी स्मारक येथे बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते.

बाबासाहेबांचे काम प्रत्येकाच्या हृदयामध्ये : पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बाबासाहेबांचे काम हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. तसेच केंद्र किंवा राज्य सरकारने बाबासाहेबांच्या आठवणी कायम जपल्या आहेत. दादरमधील बाबासाहेबांचे वास्तव्याचे घर असेल, लंडनमधील घर असेल, बाबासाहेबांचे इंदू मिलचे स्मारक असेल किंवा दीक्षाभूमी असेल. येथील सर्व ठिकाणांना मोदीजींनी स्मारकांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकार जगाला हेवा वाटावा, असं भव्य दिव्य स्मारक इंदू मिलमध्ये तयार करतंय. त्याचबरोबर आज बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मला वाटतं बाबासाहेबांचा संविधान दिन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून 2015 साली सुरू केला. तो बाबासाहेबांचा संविधान दिन देखील आपण साजरा करतोय, असं मुख्यमंत्री म्हणाले.

जब तक सुरज चॉंद रहेंगा : दरवेळेला निवडणुका आल्या की, विरोधक संविधान बदलणार, संविधान बदलणार अशा प्रकारची ओरड करून या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. परंतु मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटलयं की, बाबासाहेबांच्या संविधानावरच आमच्या देशाचा कारभार सुरू आहे आणि म्हणून संविधान बदलण्याची कुणाची हिम्मत नाही. 'जब तक सूरज चॉंद रहेगा, बाबासाहेब का संविधान कायम रहेगा' असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या सर्व खोट्यानाट्या आरोपांमध्ये लोकांनी विचलित होण्याची आवश्यकता नाही. खरं म्हणजे बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव करण्याचं काम काँग्रेसनं केलं. त्यामुळे या काँग्रेसला किंबहुना विरोधी पक्षाला बाबासाहेबांवर, संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर केली.

मोदींजींचे विकासावर फोकस : एनजीएचा जाहीरनामा आलाय. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की गरीब, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हे जे चार देशाचे प्रमुख घटक आहेत. यांच्यावरच मोदीजींनी पूर्ण फोकस केलेला आहे आणि त्यांच्यासाठी या जाहीरनाम्यात देखील मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आलेय.

गोळीबाराचा प्रकार अतिशय दुर्दैवी : सलमान खानच्या घरी गोळीबाराची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मी स्वतः सकाळी सात वाजता पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि मी स्वतः सलमान खानशी देखील बोललो आहे. त्यांनाही दिलासा दिला आहे. कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, आमचे पोलीस या घटनेचा तपास करत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा :

  1. नवजात बालकांची पाच लाखात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सहा महिलांना तीन दिवसांची पोलीस कोठडी - Child Trafficking Pune
  2. "बारामती लोकसभेची निवडणूक विचाराची लढाई, नात्याची नाही"; सासऱ्यांच्या टीकेवर सुनेचं उत्तर - Sunetra pawar
  3. "चिल्लर कार्यकर्त्याला पोलीस संरक्षण, जनता...", -सलमानच्या घराबाहेरील गोळीबारावरून राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल - Sanjay Raut today News
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.