ETV Bharat / state

"घोसाळकरांची हत्या हा ठाकरे गटातील टोळीयुद्धाचा परिणाम" - नितेश राणे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 5:09 PM IST

Abhishek Ghosalkar
Abhishek Ghosalkar

Abhishek Ghosalkar : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या हा ठाकरे गटातील टोळीयुद्धाचा परिणाम असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. एका बाजूला आदित्य ठाकरे तर, दुसरीकडे संजय राऊत यांच्यात टोळीयुद्ध सुरू झाल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे यांची प्रतिक्रिया

मुंबई Abhishek Ghosalkar : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा या स्वघोषित समाजसेवकाने त्याच्या कार्यालयात गोळ्या झाडून हत्या केली. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाई यानं फेसबुक लाईव्ह दरम्यान पाच गोळ्या झाडल्या होत्या. घोसाळकर यांच्या हत्येनंतर मॉरिसनं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलीय.

भाजपा आमदार नितेश राणेंचा खळबळजनक दावा : अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते करत आहेत. यावर भाजपा आमदार नितेश राणे यांनी एका व्हिडिओद्वारे खळबळजनक दावा केला आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या उद्धव ठाकरे गटातील टोळीयुद्धाचा परिणाम असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

ठाकरे गटात टोळीयुद्ध : एका बाजूला आदित्य ठाकरे तर, दुसरीकडे संजय राऊत यांच्यात टोळीयुद्ध सुरू आहे. आरोपी मॉरिस हा काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या न्याययात्रेच्या तयारीत होता. मॉरिस नेहमी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बॅनर का लावत होता?, असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला. संजय राऊत ज्या प्रकारे तेजस ठाकरेंचा प्रचार करत आहेत, त्यामुळं आदित्य ठाकरेंच्या गोटात नाराजी वाढत आहे. त्यामुळं हे टोळीयुद्ध मोठ्या प्रमाणात वाढलंय. मॉरिस तसंच संजय राऊत यांच्यातील संभाषणाचा सीडीआर तपासण्याची मागणी राणेंनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतःकडे बघावं. ठाकरे गटानं आधी टोळीयुद्ध थांबवावं. मगच महायुती सरकारवर टीका करावी, अशी खरमरीत टीका नितेश राणे यांनी केली आहे.

अशी घडली घटना : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी लालचंद पाल स्वतः त्यांच्यासोबत होते. गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी असलेल्या पाल यांनी थरारक अनुभव त्यांनी सांगितलाय. अभिषेक घोसाळकर यांना काल सकाळी अकरा वाजता मॉरिसचा फोन आला होता. त्यानंतर सायंकाळी मॉरिसनं फेसबुक लाईव्ह करण्यासाठी अभिषेक घोसाळकर यांना ऑफिसमध्ये नेलं, अशी माहिती लालचंद पाल यांनी दिली आहे.

गोळ्या संपल्यानंतरही अभिषेकवर गोळीबार : खूप उशीर झाल्यामुळं 'मी' दरवाजा उघडला तेव्हा, दोघेही आपापल्या मोबाईलवर फेसबुक लाईव्ह करत होते. लालचंद पाल यांनी सांगितलं की, मी गेल्यानंतर मॉरिसनं आपण थोड्या वेळानं येऊ, असं सांगून मला बाहेर काढलं. त्यानंतर बंदुकीचा गोळीबार झाला, तेव्हा मी आत पळत गेलो, तेव्हा अभिषेकवर गोळीबार झाल्यानं तो खाली पडला होता, तरीदेखील मॉरिस त्याच्यावर गोळीबार करत होता, अशी माहिती पाल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

'हे' वाचलंत का :

  1. अभिषेक घोसाळकर खून प्रकरण नेमकं काय ? 'मॉरिस भाई'नं का केला थंड डोक्यानं खून आणि नंतर आत्महत्या...!
  2. उद्धव ठाकरेंनी घेतलं अभिषेक घोसाळकर यांचं शेवटचं दर्शन, दुपारी अंत्यसंस्कार
  3. कोरोना योद्धा ते कोल्ड ब्लडेड मर्डरर! जाणून घ्या कोण होता अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणारा मॉरिस नरोना?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.