ETV Bharat / politics

मनसेच्या एन्ट्रीमुळं नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार? काय म्हणाले राजकीय तज्ज्ञ? - lok sabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 9:56 PM IST

Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देशाचे नेतृत्व करावं हीच आपली इच्छा आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढली आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी, मनसेने महायुतीला दिलेल्या पाठिंबामुळं नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला फायदा होईल असं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.

नाशिक Lok Sabha Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळं मनसैनिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्यानं, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला याचा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा : 2006 रोजी मनसेची स्थापना झाली. 2007 मध्ये मनसेने महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या. यात मुंबई महानगरपालिकेत 7, पुणे महानगरपालिकेत 8, नाशिक महानगरपालिकेत 12 आणि ठाणे महानगरपालिकेत तीन नगरसेवक निवडून आले होते. यानंतर नाशिकमध्ये 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे राज्यात 13 आमदार निवडून आलेत. यात नाशिक शहरातील 3 आमदार होते. यानंतर 2012 मध्ये राज ठाकरे यांच्या करिष्माची जादूने नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवला. तब्बल 40 जागांसह सलग पाच वर्ष मनसेने नाशिक महानगरपालिकेवर सत्ता उपभोगली. मात्र, 2017 च्या निवडणुकीत मोदीच्या लाटेमुळं अवघ्या पाच जागांवर मनसेला समाधान मानावं लागलं होतं.


विकास कामे करून देखील जर मतदान करत नसेल तर : नाशिकमध्ये इतकी विकास कामे करूनही जर नाशिककर मतदान करणार नसतील तर कोण कशाला येथे पुन्हा असा सवाल करून राज ठाकरे यांनी नाशिककरांवर नाराजी व्यक्त केली होती. याच काळात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्यानं अनेकांनी मनसेची साथ सोडली होती. आम्ही पक्ष स्थापन होण्याच्या आधीपासून कामे केली. लोकांच्या पक्षाकडून अपेक्षा फार होत्या. पण एसीमध्ये बसून राजकारण करणाऱ्याचं राज ठाकरे यांनी ऐकलं. त्यांनी कार्यकर्त्यांना वेळ दिला असता तर कुणी सोडून गेलं नसतं, असं म्हणत नाशिकचे मनसेचे प्रमुख नेते माजी आमदार वसंत गीते मनसेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्यासोबत मनसेच्या अनेक माजी नगरसेवकांनी मनसेला राम राम ठोकला होता.

राज ठाकरे यांचा सेफ गेम : यंदा राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला नाही किंवा आपली भूमिका स्पष्ट केली नसती तर, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते इतरत्र पक्षात जातील अशी देखील भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळं लोकसभा नंतरच्या विधानसभा, महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देत सेफ गेम खेळल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा -

  1. देशपातळीवर पक्ष फोडाफोडीचं पेटंट फक्त भाजपाकडे, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची टीका - Congress MLA Satej Patil
  2. महायुतीच्या जागा वाटपाचे घोंगडे भिजतच; मात्र मनभेद नसल्याचा नेत्यांचा दावा... - Lok Sabha Election 2024
  3. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून किरण सामंत निवडणूक लढवणार? काय म्हणाले दीपक केसरकर? - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.