ETV Bharat / politics

कलंकित काँग्रेस सत्ता हिसकावण्याचे स्वप्न पाहत आहे, पण इंडिया आघाडी दोन टप्प्यातच पराभूत : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Lok Sabha Election 2024

author img

By PTI

Published : Apr 29, 2024, 6:23 PM IST

Updated : Apr 29, 2024, 7:39 PM IST

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024: भाजपा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापूरमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केलाय.

सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूर Lok Sabha Election 2024 : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापूर शहरातील होम मैदान या ठिकाणी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला मराठी भाषेमध्ये आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्यांनतर त्यांनी संविधान बदलणार आणि आरक्षण संपवणार, असा खोटा आरोप आमच्यावर इंडिया आघाडीकडून केला जातो. यावेळी सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केलाय.

"पाच वर्षांत पाच पंतप्रधान" : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात इंडिया आघाडीचा पराभव झाला आहे, याची जाणीव नसतानाही काँग्रेस आपली ‘कलंकित पार्श्वभूमी’ असूनही देशाची सत्ता हिसकावण्याचे स्वप्न पाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. सोलापुरातील सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, INDI ब्लॉकमध्ये नेतृत्वावरच 'महायुद्ध' सुरू आहे आणि त्यांनी "पाच वर्षांत पाच पंतप्रधान" असा फॉर्म्युला आणला आहे, जे शेवटी देशाला लुटतील. इंडिया आघाडीचा नेता कोण होणार यावर सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. एवढा मोठा देश ज्याचा चेहरा ओळखत नाही अशा व्यक्तीच्या हाती तुम्ही सोपवू शकता का, असं मोदींनी म्हटलंय. यावेळी मोदींनी दावा केला की, जर इंडिया आघाडी सत्तेवर आली तर ते पाच वर्षांच्या कार्यकाळात एक वर्षात एक पंतप्रधान फॉर्म्युला घेऊन काम करेल.

10 टक्के दिलं आरक्षण : सत्ता बळकावण्यासाठी हे लोक देशाचं विभाजन करत आहेत. आता पाच वर्षांत पाच पंतप्रधानांचा नवा फॉर्म्युला आणला आहे. गेल्या 10 वर्षात तुम्ही मोदींचा प्रत्येक पैलू पाहिला असला तरी, इंडिया आघाडीचा नेता कोण असेल यावर एकमत नाही. गेल्या 10 वर्षांत मोदींच्या म्हणजे आपल्या सरकारनं खऱ्या सामाजिक न्यायावर भर दिलाय. मागासवर्गीयांचे हक्क हिरावून न घेता, आम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना 10 टक्के आरक्षण दिलंय. सर्वसामान्य प्रवर्गातील गरीब लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही 10 टक्के आरक्षण दिलं आणि देशातील दलित नेत्यांनी त्याचं सकारात्मक स्वागत केलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

म्हणून मोदींना रोज शिव्या देतात : एकाचा हक्क दुसऱ्याच्या फायद्यासाठी आम्ही हिरावून घेतला नाही. आमची कल्पना आणि सामाजिक न्याय निश्चित करण्याचा मार्ग समाजात फूट निर्माण करणार नाही. देशाच्या विकासाबद्दल बोलण्यासारखं काही नसल्यामुळं इंडिया आघाडीचे नेते मोदींना रोज शिव्या देतात. पुढे मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारनं देशातील २५ कोटी गरीब लोकांना दारिद्र्य रेषेच्यावर आणलंय. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना काँग्रेसनं काश्मीरमध्ये लागू होऊ दिली नाही, असा दावा मोदींनी केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकणार नाहीत : सद्य स्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरही आरक्षण संपवू शकणार नाहीत. मोदींचा तर सवालच नाही. मोदीकडं आज जेवढं पाहिजे तेवढे मतदान आहे. पण तो रस्ता आम्हाला मान्य नाही. शेकडो वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला. आमच्या पूर्वजांकडून पाप झालं असेल. माझ्यासाठी ही प्रायश्चित घेण्याची वेळ आहे. त्यामुळं आरक्षणासाठी जेवढी ताकद देता येईल, तेवढी ताकद देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरच्या सभेत बोलताना दिला.

हेही वाचा -

  1. कोल्हे आणि आढळराव एकाच मंचावर; महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेऊन मतदान करा, कोल्हेंचं आवाहन - Lok Sabha Election 2024
  2. बाप्पा यांना पाव रे! अरविंद सावंत, अनिल देसाईंसह राहुल शेवाळे अर्ज दाखल करण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या चरणी - Lok Sabha Election
  3. पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र! आज आणि उद्या राज्यात घेणार सहा सभा, भर उन्हात तापणार राजकारण - LOK SABHA ELECTION 2024
Last Updated :Apr 29, 2024, 7:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.