ETV Bharat / bharat

Kavita Petition in Supreme Court: 'माझी अटक बेकायदेशीर'; कविता यांची ईडी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 11:39 AM IST

Kavita Petition in Supreme Court: 'माझी अटक बोकायदेशीर'; कविता यांची ईडी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
Kavita Petition in Supreme Court: 'माझी अटक बोकायदेशीर'; कविता यांची ईडी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

Kavita Petition in Supreme Court : बीआरएसच्या नेत्या कविता यांनी ईडीच्या कारवाई विरोधत सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलीय. अटक बेकायदेशीर असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलंय.

नवी दिल्ली Kavita Petition in Supreme Court : दिल्ली मद्यधोरण प्रकरणात बीआरएसच्या नेत्या कविता यांना ईडीनं अटक केलीय. यानंतर त्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केलीय. अटक हे केवळ नियम आणि कायद्यांचं उल्लंघन नाही तर मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचं त्यांनी याचिकेत नमूद केलं. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) याबाबत एकतर्फी आणि हुकूमशाही पद्धतीनं कारवाई केल्याचं याचिकेत म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी प्रलंबित असतानाही ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकतर्फी कारवाई केल्याचा दावा त्यांनी याचिकेत केलाय.

आरोपपत्रांमध्ये नाव नसताना अटक : कविता यांनी याचिकेत म्हटले, "दिल्लीच्या मद्यधोरण प्रकरणात माझा काहीही संबंध नसतानाही ईडी माझी चौकशी करत आहे. या प्रकरणी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये किंवा आतापर्यंत दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्येही माझं कुठंही आरोपी म्हणून नाव दिलेलं नाही. 2022 मध्ये सीबीआयनं माझी सात तास चौकशी केली. कोणत्याही पुराव्याअभावी माझा आरोपी म्हणून समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, या प्रकरणात सहभागी असलेल्या काही लोकांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे ते मला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मला अटक करणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळं नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचं दिसून येत आहे. काही लोकांना वेठीस धरण्यासाठी केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून राजकीय हिंसाचार सुरुच ठेवत आहे. दिल्लीतील मद्यधोरण प्रकरणाचा आधार घेत केंद्रातील सत्ताधारी पक्ष काही लोकांना टार्गेट करुन त्रास देत असल्याचं कविता यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलंय.

अटकेचं कारण सांगितलं नाही : ट्रान्झिट रिमांड वॉरंटशिवाय बेकायदेशीरपणे दिल्लीत आणण्यात आलं असून त्यांनी अटकेचं कारण सांगितलं नसल्याचं कविता यांनी याचिकेत म्हटलंय. तसंच अटकेच्या आदेशात नमूद केलेली कारणे पूर्णपणे खोटी आहेत. ट्रायल कोर्टासमोरील रिमांड अर्जही दिशाभूल करणारा आहे. मनी लाँडरिंग कायदा-2002 च्या कलम 19(1) नुसार, एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचं कारण त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारे लिखित स्वरुपात नोंदवलं जाणं आवश्यक आहे. तसं केलं नाही. त्यामुळं ईडीची कारवाई बेकायदेशीर, मनमानी, असंवैधानिक आणि एजन्सीनं सर्वोच्च न्यायालयासमोर दिलेल्या आश्वासनाचं उल्लंघन असल्यानं रद्द करावी. एका महिलेविरुद्ध मनी लाँडरिंग कायदा 2002 चं कलम 19 चा अर्ज बेकायदेशीर मानला जावा. ही अटक रद्द करण्यात यावी, असं याचिकेत नमूद करण्यात आलीय.

कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची परवानगी देण्यासाठी अर्ज : कविता यांनी मंगळवारी राऊस एव्हेन्यू पीएमएलए न्यायालयात आई, मुलगा आणि इतर जवळच्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला. न्यायाधीश एमके नागपाल यांनी हा अर्ज मंजूर केला. अर्जात नमूद केलेल्या व्यक्तींनी बुधवारी संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान ईडीच्या ताब्यात असलेल्या कविताला भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यांचे भाऊ केटीआर यांनी मंगळवारी संध्याकाळी कविता यांची भेट घेतली.

हेही वाचा :

  1. ED Arrests BRS MLC Kavita : के. कविता यांना ईडीनं केली अटक, दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.