धुळे : वीज पडल्याने शेतकऱ्याचा 300 क्विंटल कांदा जळून खाक

By

Published : Jun 8, 2021, 3:55 PM IST

Updated : Jun 8, 2021, 4:46 PM IST

thumbnail

धुळे - काल सकाळी तालुक्यातील बुरझडसह परीसरात विजेच्या गडगडाटांसह मुसळधार पाऊस झाला. वीज वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असतानाच बुरझड शिवारात शेतकरी शरद उत्तम पाटील यांनी साठवण केलेल्या कांदाचाळी वीज कोसळल्याने जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये सुमारे ३०० क्विंटल कांदा जळून खाक झाला. वीज पडल्यानंतर सुमारे दीड तास सुरु असलेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. त्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची दखल घेत पंचनामा केला. तसेच मदतीचे आश्वासन दिले.

Last Updated : Jun 8, 2021, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.