संततधार पावसामुळे सोयाबीन पिकाची नासाडी, शेतकऱ्यांची दिवाळी यंदाही अंधारातच
अमरावती - ज्या पिकावर वर्षभराच कर्ज फेडून दिवाळी साजरी करू या आशेने शेतकरी काम करत असतो तेच पिक यंदा हातातून गेले आहे. आता काय करावं आणि पुढचे दिवस कसे काढावेत असा पेचप्रसंग शेतकऱ्यांसमोर उभा आहे. दरम्यान, एवढ्या प्रमाणावर नुकसान होऊनही सरकारकडून आणखी पंचनामा नाही, ना कुठली मदत नाही. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनी-