VIDEO :...'त्या' विरोधात मोहन भागवतांनी आंदोलन करावं आणि मोदी-शहांना जाब विचारावा!

By

Published : Nov 14, 2021, 12:05 PM IST

Updated : Nov 14, 2021, 12:11 PM IST

thumbnail

मुंबई - अमरावतीत झालेल्या हिंसाचारावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी परखड प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, रझा अकादमी काय म्हणते मला माहिती नाही. मात्र रझा अकादमी मध्ये दंगली भडकवण्याची ताकद नाही. त्रिपुरात असे काय घडलं की त्याचे पडसाद केवळ राज्यातच उमटले. बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश मध्ये त्रिपुरातील घटनेचे पडसाद का उमटले नाही, असा सवाल त्यांनी केला. काश्मीरमध्ये हिंदू पंडितांना मारले जाते. त्याविरोधात कोणी आंदोलन का करत नाही. काश्मीरातील पंडितांच्या हत्येप्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नेत्तृत्वात दिल्लीमध्ये आंदोलन झाले पाहिजे आणि मोदी-शहांना जाब विचारला पाहिजे, असे राऊत म्हणाले. हा सर्व प्रकार महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा आणि तणाव निर्माण करण्यासाठीचा डाव आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

Last Updated : Nov 14, 2021, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.