Bus Catches Fire: मुंबई अहमदाबाद महामार्गावर आगीत बस जळून खाक, 14 प्रवासी थोडक्यात वाचले!

By

Published : Apr 30, 2023, 7:32 AM IST

Updated : Apr 30, 2023, 7:37 AM IST

thumbnail

पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बस जळून खाक झाली. परंतु या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पालघर पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये 14 प्रवासी प्रवास करत होते. त्यांची वेळीच सुटका करण्यात आली. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बसला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेच्या वेळी बसमध्ये 14 प्रवासी होते. ते सगळे ठिक आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. बस अहमदाबादहून हैदराबादला जात होती. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. पुढील तपास सुरू असून तपशीलाची प्रतीक्षा आहे. जानेवारीच्या सुरुवातीला, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला तिच्या स्टार्टरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली होती. 65 प्रवासी घेऊन ही बस ठाण्याहून भिवंडीकडे जात होती. सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Last Updated : Apr 30, 2023, 7:37 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.