खालापुरात गौरी-गणपतीला भक्तिमय वातावरण निरोप

By

Published : Sep 14, 2021, 9:45 PM IST

thumbnail

खालापूर (रायगड) - गणपती बाप्पांच्या आगमनाने सर्वत्र उत्साहाने - आनंदाचे वातावरण झाले आहे. चार दिवसानंतर मंगळवारी पाच दिवसाच्या घरगुतीसह काही सार्वजनिक गणपती बाप्पांसोबत गौरीला निरोप देण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व भक्तांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत भक्तीमय वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया - पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला' असा जयघोषात भक्तिभावाने भाविकांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. मंगळवारी दुपारपासूनच सर्वच ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळात आणि प्रत्येक रस्त्यावर भक्तिमय वातावरणासह मोठ्या प्रमाणात भक्त सहभागी होत गणपती बाप्पाचे विसर्जन करता सज्ज झाले होते. गौरी गणपतीचे आगमन झाल्यानंतर मंगळवार पाचव्या दिवशी गणपती बाप्पासह गौरीचे विसर्जन करण्यात आले. खालापूर तालुक्यात सर्वच ठिकाणी भाविक भक्तांनी नदी, तलाव फुलून गेले होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.