Samruddhi Highways Work Credit : समृद्धीसाठी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राच्या जनतेला सगळे माहीत - चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर - महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग ( Samruddhi Highway in Maharashtra ) तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी शेकडो ( Efforts for Samruddhi highway ) बैठका घेतल्या होत्या. प्रत्यक्ष निर्माण स्थळावरचे दौरे केल्यानंतर हा महामार्ग पूर्णत्वास आला आहे. त्यामुळे आता कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्राच्या जनतेला हे माहीत आहे ही दूरदृष्टी कोणाची आहे. मुख्यमंत्री श्रेयवाद करत असल्याची टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule slammed CM Uddhav ) यांनी केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST