India vs Pakistan T20 World Cup 2022: T20 विश्वचषक 2022 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. दिवाळीच्या मुहूर्तावर टीम इंडियाने आपल्या चाहत्यांना विजयाची भेट दिली आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 160 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले. विराट कोहलीने तुफानी कामगिरी केली. त्याने 82 धावांची नाबाद खेळी खेळली.
पाकिस्तानप्रमाणेच भारताचीही खराब सुरुवात झाली. त्याने पहिले ४ विकेट लवकर गमावले. पण कोहली आणि हार्दिक पांड्याने आघाडी कायम ठेवली. कोहलीने 53 चेंडूत नाबाद 82 धावा केल्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तर पांड्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने 2 षटकार आणि 1 चौकार लगावला.
रोहित-राहुल अपयशी ठरले: या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल अपयशी ठरले. रोहित 4 धावा करून बाद झाला. केएल राहुलही 4 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने 10 चेंडूत 15 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 चौकारांचा समावेश होता. अक्षर पटेललाही विशेष काही करता आले नाही. तो धावबाद झाला. दिनेश कार्तिक 1 धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात रविचंद्रन अश्विन फलंदाजीला आला आणि त्याने शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत भारताला विजय मिळवून दिला. अशाप्रकारे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून विजय मिळवला.
पाकिस्तानसाठी इफ्तिखार-मसूदने अर्धशतक ठोकले: प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 159 धावा केल्या. यादरम्यान इफ्तिखार अहमदने संघासाठी अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. मसूदने नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने 42 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. मसूदच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. कर्णधार बाबर आझम खाते न उघडताच बाद झाला. रिझवान 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शादाब खान 5 आणि हैदर अलीने 2 धावा करून बाद झाले.
अर्शदीप-पंड्याने ३-३ विकेट घेतले: भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करताना ३-३ बळी घेतले. अर्शदीपने 4 षटकात 32 धावा दिल्या. हार्दिकने 4 षटकात 30 धावा दिल्या. मोहम्मद शमीने 4 षटकात 25 धावा देत 1 बळी घेतला. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 22 धावा देत 1 बळी घेतला.