ETV Bharat / state

पाच वर्षापासून माकडे व अन्य मुक्या जनावरांची सेवा करणारे मुकुंदराव नप्ते महाराज

author img

By

Published : May 6, 2019, 12:26 PM IST

या घाटाच्या पायथ्याशी वन विभागाने गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी हातपंप सुरू केली होती, पण त्या पाणी भरण्यासाठी कोणालाच वेळ नव्हता.

मुक्या जनावरांची सेवा करणारे मुकुंदराव नप्ते महाराज

वाशिम - राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मुक्या प्राण्यांची अवस्था खुपच बिकट आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील अंधारसावंगी येथील मुक्या प्राण्यांसाठी मुकुंदराव नप्ते यांनी या गावातील हातपंपावरून पाणवठे तयार केले आहेत. नप्ते हे गेल्या अनेक वर्षापासून विशेष करून माकडांच्या पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मुक्या जनावरांची सेवा करणारे मुकुंदराव नप्ते महाराज

अंधारसावंगी हे गाव घनदाट वसलेले आहे. या जंगलातून जाण्यासाठी एक मोठा घाट आहे. पाण्यासाठी वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती पाहता गेल्या पाच वर्षांपासून मुकुंदराव नप्ते यांनी हात पंपावरून पानवठे तयार करून माकडांसाठी खाण्यासाठी व्यवस्था करून वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या घाटाच्या पायथ्याशी वन विभागाने गेल्या पाच-सात वर्षांपूर्वी हातपंप सुरू केली होती, पण त्या पाणी भरण्यासाठी कोणालाच वेळ नव्हता. त्यामुळे जंगलातील हरीण, कोल्हे, बिबट्या, माकड, मोर, लांडगे या प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. मुकुंदराव यांनी येथील वन्यप्राण्यांची होणारी भटकंती पाहता गेल्या पाच वर्षापासून येथील हात पंपावरून दररोज सकाळी जंगलात जाऊन पाणवठे भरतात आणि माकडांसाठी खाण्याची व्यवस्था करतात.

Intro:मालेगाव तालुक्यातील हे आहे अंधारसावंगी गाव इथे जायचं म्हटलं की घनदाट जंगलातून करावे लागते प्रवास या मार्गावर एक मोठा घाट आहे वय घाटात पाण्यासाठी वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती पाहता गेल्या पाच वर्षांपासून मुकुंदराव नप्ते महाराज यांनी जंगलातील असलेल्या हात पंपावरून पानवठे भरून विशेष म्हणजे शेकडो माकडांसाठी दररोज खाण्यासाठी व्यवस्था करून वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत...Body:या घाटाच्या पायथ्याशी वन विभागाच्या वतीने हातपंप गेली पाच-सात वर्षांपूर्वी सुरू केली होती या ठिकाणावर पातुर वन विभागाने पाणवठे सुध्दा तयार केले मात्र त्यामध्ये पाणी भरण्यासाठी कोणालाच वेळ नाही त्यामुळे जंगलातील हरण,कोल्हे,बिबट्या माकड,मोर,लांडगे व रोही प्राणी रात्रीच्या वेळी पाण्याच्या शोधात असतात त्यामुळे मुकुंदराव महाराजांनी येथील वन्यप्राण्यांची होणारी भटकंती पाहता गेल्या पाच वर्षापासून येथील हात पंपावरून दररोज सकाळी आठ वाजता जंगलात जाऊन पाणवठे भरणे व माकडांसाठी खाण्याची व्यवस्था करून वापस येत असताना पुन्हा पानवठे भरतात..
Conclusion:एवढेच नव्हे तर या जंगलातील माकड महाराजांच्या आवाज दिल्यावर येतात व त्यांचा ऐकतात हे विशेष...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.