ETV Bharat / state

गांधी जयंती : ३५० किलोमीटर पायदळ दौड करत गांधीजींना आदरांजली, वाचा...

author img

By

Published : Oct 2, 2019, 11:40 PM IST

गांधी जयंती : ३५० किलोमीटर पायदळ दौड करत गांधीजींना आदरांजली, वाचा...

गांधी जयंतीच्या निमित्ताने कुणी सूतकताई करून, कुणी स्वच्छता अभियान राबवून तर कुणी उपवास करून गांधीजींना आदरांजली वाहत आहेत. पण जालना येथील वकील राजेश ढवळे यांनी तब्बल ३५० किलोमीटर अंतर पायदळ दौड करत पूर्ण केली.

वर्धा - महात्मा गांधीजींना १५० व्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांतून आदरांजली वाहण्यात येत आहे. अशातच जालना येथील पेशाने वकिल असलेले राजेश ढवळे यांनी ३५० किलोमीटर अंतराची पायदळ दौड करत गांधीजींना आदरांजली वाहिली. ढवळे यांनी ही दौड ८ दिवसांमध्ये पूर्ण करत आज (बुधवार) सेवाग्राम गाठले.

गांधी जयंतीच्या निमित्ताने कुणी सूतकताई करून, कुणी स्वच्छता अभियान राबवून तर कुणी उपवास करून गांधीजींना आदरांजली वाहत आहेत. पण जालना येथील वकील राजेश ढवळे यांनी तब्बल ३५० किलोमीटर अंतर पायदळ दौड करत पूर्ण केली.

३५० किलोमीटर पायदळ दौड करत गांधीजींना आदरांजली वाहणारे राजेश ढवळे

जालना येथून ढवळे यांनी २५ सप्टेंबर या तारखेला गांधी दौड सुरू केली होती. ते आज ३५० किलोमीटर अंतर पार करुन वर्ध्यात पोहोचले. हे अंतर पार करायला त्यांना ८ दिवसांचा कालावधी लागला. रोज साधरण ५० किलोमीटर अंतर पार करत आज सेवाग्राम पावन भूमीत पोहचले.

ढवळे यांना गावागावातील सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांनी मुक्कामाची व्यवस्था करुन दिली. या प्रवासादरम्यान, लागलेल्या गावांमध्ये त्यांनी गांधीजींच्या विचारांचा जागर केला. सेवाग्रामला पोहोचल्यानंतर सेवाग्राम आश्रम, नई तालीम समितीच्या वतीने अॅड. ढवळे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी गांधीजींच्या एका यात्रेतून ही कल्पना सुचल्याचे सांगितले.

हेही वाचा - महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात 150 ठिकाणी गांधीवादी करणार उपवास

हेही वाचा - निम्न वर्धा प्रकल्पाच्या 31 गेट मधून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Intro:वर्धा
mh_war_gandhi_sandesh_daud_vis_byte_7204321

जालना ते सेवाग्राम गांधी संदेश दौड, पेशाने वकील असतांना गांधी संदेश देत केली दौड

-350 किलोमीटरची दौड करून गांधीजींना आदरांजली


वर्धा - महात्मा गांधीजींना दीडशेव्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांतून आदरांजली वाहण्यात येत आहे. अशातच जालना येथील पेशाने वकिल असलेले गांधीन प्रति संदेश दौड केली. साडेतीनशे किलोमीटर अंतराची दौड गांधींच्या संदेश सांगत हा प्रवास पूर्ण करून आज सेवाग्रामला पोहचले. राजेश ढवळे, असे या वकिलांचे नाव आहे.777


गांधीजींना कुणी सूतकताई करून, कुणी स्वच्छता अभियान राबवून तर कुणी उपवास करून आदरांजली वाहत आहेत. पण जालना येथील वकील ऍड. राजेश ढवळे यांनी तब्बल साडेतीनशे किलोमीटर अंतर पायदळ दौड करत पूर्ण केली. जालना येथून 25 सप्टेंबर या तारखेला गांधी दौड सुरू झाली. हे अंतर पार करायला त्यांना 8 दिवसांचा कालावधी लागला. रोज साधरण 50 किमी अंतर पार करत आज सेवाग्राम पावन भूमीत पोहचले.


या अंतरात काही गावांमध्ये सामाजिक संघटना, कार्यकर्ते तर काही गावामध्ये स्वतः मुक्कामाची व्यवस्था केली. दौड करताना मध्ये असलेल्या गावांत त्यांनी गांधीजींच्या विचारांचा जागर केला. सेवाग्रामला पोचल्यानंतर सेवाग्राम आश्रम, नई तालीम समितीच्या वतीने ऍड. ढवळे यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी त्यांनी गांधीजींच्या एका यात्रेतून ही कल्पना सुचल्याच त्यांनी सांगितल. सेवाग्राम येथे पोहचून आज गांधीजींच्या 150 व्या जयंतीदिनी या यात्रेचा समारोप करण्यात आला.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.