ETV Bharat / state

Manisha Kayande criticizes Uddhav Thackeray: मनीषा कायंदे यांचा शिंदे गटात प्रवेश, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाली सर्वात मोठी जबाबदारी

author img

By

Published : Jun 19, 2023, 7:20 AM IST

Manisha Kayande criticizes Uddhav Thackeray
मनीषा कायंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाला एकामागून एक धक्का देत आहेत. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यातच शिवसेनेचा वर्धापनदिन शिंदे आणि ठाकरे गटाकडून साजरा होत असताना वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जाहीर प्रवेश केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील आनंद आश्रमात भव्य पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत तसेच ठाकरे गटावर टीका केली.

मनीषा कायंदे यांचा पक्षाच्या वर्धापनदिनापूर्वीच ठाकरे गटाला धक्का

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी कांयदे यांच्याकडून व्यक्त केली.




पहिल्यांदा सचिव पदाची जबाबदारी : पक्ष प्रमुखांशी बोलताना अडचण येत होती. खरे तर बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे. म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहे, असे कायंदे म्हणाल्या आहेत. शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सचिव पदाची जबाबदारी मनिषा कायंदे यांना देण्यात आल्याची घोषणा यावेळी शिंदे यांनी केली. तसेच मुंबई महानगर पालिकेचे माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल आणि त्यांचा पत्नी सानवी तांडेल यांनी देखिल शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा सचिव पदाची कायंदे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

खऱ्या अर्थाने आमचे सरकार काम करत आहे. आमचा फोकस वैयक्तिक लाभापेक्षा सर्वसामान्य लोकांना काय मिळेल, यावर आहे. - एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा दिवस : या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्याचा वर्धापन दिन बाळासाहेबांच्या विचारांचा वर्धापन दिन आहे. वाघाने डरकाळी फोडल्यावर काय होते, मोदी साहेबांचे काम आहे नुसते आरोप करणाऱ्यांचे लोकांचा काय होईल, हे दिसेल. बाळासाहेब यांचे स्वप्न करणाऱ्या लोकांसोबत बरोबर युती केली आहे. तुम्ही सत्तेसाठी गेला आहात. गरज सरो वैद्य मरो, असे शब्द आहेत. उद्या बोलले तीच कॅसेट आहे. नवीन काही नाही. आम्ही सरकार पुढे नेत आहोत.

हेही वाचा :

  1. Kayande vs Rane : राणे तुमच्या अंगणात जे दोन धतुरे उगवलेत त्यावर लक्ष द्या, मनीषा कायंदे यांची टीका
  2. Manisha Kayande : मनीषा कायंदेंचा राहुल शेवाळेंवर गंभीर आरोप, पाहा काय म्हणाल्या कायंदे
  3. Maharashtra Political Crisis : शिवसेना आमदारांच्या बंडाळी मागे भाजपचा हात; मनीषा कायंदे यांची टीका
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.