ETV Bharat / state

Building Collapses In Bhiwandi: भिवंडीत दुमजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, दुसऱ्याला वाचवण्यात यश

author img

By

Published : Jan 27, 2023, 10:24 AM IST

Updated : Jan 27, 2023, 1:03 PM IST

Building Collapses In Bhiwandi
भिवंडीत दुमजली इमारत कोसळली

आज पहाटे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात पहाटे दोन मजली इमारत कोसळली. या अपघातात एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य एकाला वाचवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील खाडीपार परिसरात पहाटे ३.३० च्या सुमारास ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले.

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली

ठाणे: इमारतीच्या तळमजल्यावर सात दुकाने होती, तर वरची दुकाने व्यावसायिकांची आहेत. इमारत कोसळल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या दोन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती, आणि बचावकार्य सुरू केले, असे निजामपुरा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले मजीद हबीब अन्सारी वय 35 असे मृतकचे नाव आहे. इमारत कोसळली तेव्हा ते आत झोपले होते. त्यांचा ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यातर अशरफ नावाच्या एका २२ वर्षीय तरुणाला वाचवण्यात यश आले आहे.

आकस्मिक मृत्यूची नोंद: त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. इमारतीचे वय आणि तिची स्थिती त्वरित कळू शकली नाही. कारण नागरी अधिकारी तेथे उपस्थित नव्हते. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दुर्घटनाग्रस्त दोन मजली इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असून या इमारतीमध्ये व्यापारी गाळे आणि कार्यलय, गोदाम होती. यामध्ये कापडाचे गोडाऊन तसेच टेक्स्टाईल कंपन्यांचे कार्यलय होते. दरम्यान घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांकडून मदतकार्य सुरु असून या मलब्याखाली आणखी कोणी अडकले आहे का ? याचा शोध मलबा हटवून घेत आहेत. विशेष म्हणजे हि घटना दिवसा घडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती.

४ वर्षात इमारती कोसळून ५७ जणांचा मृत्यू :भिवंडी महापालिका हद्दीत अतिधोकादायक इमारतींची संख्या ५८९ असून धोकादायक इमारतींची संख्या ४०० एवढी आहे. धोकादायक इमारतींना नोटीस देऊन देखील काही नागरिक आपल्या परिवाराचे स्थलांतर करीत नसल्याने पावसाळ्यात या धोकादायक इमारती कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये शहरातील धामणकर नाका परिसरात असलेली जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर २५ जण जखमी झाले आहेत. यापूर्वी देखील शहरात धोकादायक व अनधिकृत इमारती कोसळून नागरिकांचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. भिवंडी शहर आणि लगतच्या ग्रामीण पट्ट्यातील धोकादायक इमारतींमध्ये सुमारे २५ हजार कुटूंब राहत आहे. सुमारे एक लाख नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तर गेल्या चार वर्षांत विविध ठिकाणी झालेल्या इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत ५७ जणांचा मृत्यू झाला. तर ६७ जण जखमी झाले आहेत.


धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर: कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहर लगतच्या ग्रामीण पट्ट्यातील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आला आहे. बांधकाम व्यवसायिकांनी शासकीय नियमांना तिलांजली देत छोट्या छोट्या जागेत वाटेल तशा मनमानी कारभार करीत इमारती बांधल्या आहेत. शासनाने दाखल घेऊन अनधिकृत धोकादायक इमारती तोडून टाकण्याच्या निर्देश पालिका प्रशासनाला दिले होते. मात्र पालिका प्रशासनाने कागदावर कारवाई झाल्याचे दाखवून इमारतीकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुन्हा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा: Palamu Accident : भरधाव स्कॉर्पिओने चिमुकल्यांना चिरडले; चार चिमुकल्यांचा करुण अंत, चालकाचाही मृत्यू

Last Updated :Jan 27, 2023, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.