Judge Salve on Bilkis Bano Case बिल्किस बानो केसमधील ११ आरोपींच्या निर्दोष मुक्तततेवर, शिक्षा ठोठावणारे माजी न्यायधीश साळवे यांचा आक्षेप

author img

By

Published : Aug 27, 2022, 8:25 AM IST

Former CBI Court Judge U D Salve on Bilkis Bano Case

गुजरात राज्यातील गोध्रा हत्याकांडानंतर झालेले बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणाने Bilkis Bano Case in State of Gujarat देशात खूप खळबळ उडाली होती. 11 आरोपींना गुजरात न्यायालयाने निर्दोषमुक्त केल्यानंतर ते सत्कार घेत फिरत आहेत. यावर राज्यातील विधान परिषदेत चर्चा झाली. यावर आपण सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश यू. डी. साळवे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी आरोपींना सोडण्यामागचे कारण काय, त्यांच्या मानसिकतेत आणि प्रवृत्तीत बदल झाला काय, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

ठाणे गुजरात राज्यातील वादग्रस्त बिल्किस बानो Bilkis Bano Case in State of Gujarat केसच्या ११ आरोपींना 11 Accused in Controversial निर्दोषमुक्त करण्यात आले. ते सत्कार स्वीकारत फिरत 11 Accused Walking Around Accepting Felicitations आहेत. त्यांना सोडण्यामागचे कारण काय, त्यांच्या मानसिकतेत आणि प्रवृत्तीत बदल झाला काय, असे प्रश्न उपस्थित करीत याच आरोपीना जन्मठेपेची शिक्षा ठोठावणारे तत्कालीन सीबीआय कोर्टाचे न्यायधीश यू. डी. साळवे यांनी प्रश्न उपस्थित Former CBI Court Judge U D Salve Objection केल्याने हे प्रकरण पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे.

बिल्कीस बानो प्रकरण सीबीआय कोर्टाचे माजी न्यायधीश यू. डी. साळवे यांचा आक्षेप

वर्तणुकीत बदल हे महत्त्वाचे नाही, मानसिकतेत आणि प्रवृत्तीत बिल्किस बानो प्रकाराची सुनावणी आणि दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ज्या तत्कालीन सीबीआय न्यायधीश यू. डी. साळवे यांनी ठोठावलेली होती. त्याच प्रकरणात आज ११ आरोपींची सुटका करण्यात आलेली आहे. त्यामुळे शिक्षा सुनावणारे आणि ठाण्यात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त सीबीआय न्यायधीश यांनी वृत्तवाहिनीना दिलेल्या मुलाखतीत या निर्णयावर आक्षेप नोंदविला. या प्रकरणातील ११ आरोपी यांची सुटका झाली. मात्र, कुठल्या कारणाने त्यांच्या वर्तणुकीत बदल हे महत्त्वाचे नाही. तर त्यांच्या मानसिकतेत आणि त्यांच्या प्रवृत्तीत बदल घडला होता काय, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

निर्दोष सुटलेले हे आरोपी सत्कार घेत फिरत आहेत त्यामुळे आरोपींना सोडण्याचा निर्णय हा जरी सरकारचा असला तरीही या प्रकरणात दोषी आरोपींच्या सुटकेच्या मागे असलेल्या कारणांचा उलगडा महत्त्वाचा आहे. तर निर्दोष सुटलेले हे आरोपी सत्कार घेत फिरत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चाताप नाही. तर त्यांच्या प्रवृत्तीत बदलही झालेला नसल्याचे सेवानिवृत्त सीबीआय न्यायधीश साळवे यांनी स्प्ष्ट केले. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत मात्र नमूद करीत सांगितले की, गुजरात राज्याच्या या निर्णयाबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गुन्ह्यातून आरोपींची सुटका होणे आणि नंतर आरोपींची सत्कार स्वीकारणे हे चुकीचे असल्याचे सांगितले.

बिल्कीस बानो प्रकरण दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात जमाव बिल्किस बानोच्या घरात घुसला. यादरम्यान गर्भवती बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार केला, तर तिच्या कुटुंबातील 7 जणांची निर्घृण हत्या केली होती. 2008 मध्ये, मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने बिल्किस बानोला 21 जानेवारी 2008 सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली. 15 वर्षांहून अधिक काळ तुरुंगवास भोगल्यानंतर, राधेश्याम या दोषींपैकी एकाने माफीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने गुजरात सरकारला या प्रकरणी निर्णय घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली ज्याने सर्व 11 दोषींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेतला.

आरोपींची झाली होती सुटका बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर Petition Against Accused Released Bilkis Bano Case सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होती. सरन्यायाधीश एन व्ही रमना, न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी होणार होती. सामाजिक कार्यकर्ते सुभाषिनी अली, रोकपी वर्मा आणि पत्रकार रेवती लाल यांनी या प्रकरणातील ११ दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. हे 11 दोषी बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार Bilkis Bano Rape Case आणि तिच्या कुटुंबातील 7 जणांची हत्या केल्याप्रकरणी 15 वर्षे तुरुंगात होते. परंतु गुजरात सरकारने राज्यात लागू केलेल्या सुटकेच्या धोरणाखाली दोषींना शिक्षा दिली आहे. त्यांना १५ ऑगस्ट रोजी सोडण्यात Convicts In Bilkis Bano Case Released आले.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेत यावर चर्चा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले की, गुजरातमधील 2002 च्या बिल्किस बानो Bilkis Bano Case प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर Supreme Court order शिक्षा देण्यात आली होती. शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका झाली. गुन्ह्यातील आरोपींना सन्मानित करणे चुकीचे आहे आणि असे कृतीला न्याय ठरू शकत नाही. एका ३५ वर्षीय महिलेवर 3 पुरुषांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावर राज्य विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, बिल्किस बानोचा मुद्दा सभागृहात उपस्थित करू नये. परंतु, सुभाषिनी अली यांनी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी धाव घेतली आहे. आता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

दोषींचे स्वागत करणे चुकीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, 14 वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर सुमारे 20 वर्षांनी आरोपींची सुटका झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या Supreme Court order आदेशानंतर सुटका झाली. पण, एखाद्या आरोपीला सन्मानित करून त्याचे स्वागत केले जात असेल तर ते चुकीचे आहे. आरोपीचे हे कृत्य समर्थनीय ठरू शकत नाही.

Bilkis Bano Rape Case गुजरात सरकारला झटका, बिल्किस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.