ETV Bharat / state

Thane Municipal Corporation : नवीन सरकार आल्यावर ठाणे महापालिकेत खांदे पालट; अभिजित बांगर नवीन आयुक्त

author img

By

Published : Sep 30, 2022, 5:19 PM IST

Avinash Bangar
अभिजित बांगर

ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर ( Abhijit Bangar New Commissioner ) यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या अपेक्षा आणि महत्त्वाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण काम करणार असल्याची ग्वाही यावेळी नवनियुक्त आयुक्तांनी दिली.

ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर ( Abhijit Bangar New Commissioner ) यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीसाठी काल प्रधान सचिव विभागाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यावर प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांची स्वाक्षरी होती. ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त विपिन शर्मा यांच्याकडून आज अविनाश बांगर यांनी पदभार स्वीकारला. याआधी अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या अपेक्षा आणि महत्त्वाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आपण काम करणार असल्याची ग्वाही यावेळी नवनियुक्त आयुक्तांनी दिली.

अभिजित बांगर


परिस्थिती हाताळता आली नसल्याने तडकाफडकी बदली : डॉ.विपीन शर्मा यांनी जून २०२० रोजी ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता तो काळ कोरोनाचा होता तत्कालीन आयुक्तांना परिस्थिती हाताळता आली नसल्याने तडकाफडकी बदलण्यात आले होते. त्यावेळी योग्य नियोजन करून त्यांनी ठाणे शहरात अवघ्या काही दिवसांत कोरोनाचा कहर आटोक्यात आणला. मात्र अवघे दोन वर्ष ३ महिनेच ते ठाणे महापालिकेच्या आयुक्त पदी राहिले.




ठाण्यातील कर्तबगार आयुक्त : ठाणे महानगरपालिकेत आतापर्यंत दोन धडाकेबाज आयुक्तांचे वर्णी लागली आणि ठाण्याचा चेहरा मोहरा बदलला. एक तर ठाण्यात पाच वर्ष कारकीर्द राबवणारे संजीव जयस्वाल आणि ठाण्याचा चेहरा मोहरा बदलणारे टी चंद्रशेखर या दोन्ही आयुक्तांनी ठाणे शहरावरती आपली छाप उमटवली आणि शहराचा विकास करून दाखवला त्यानंतर आलेल्या सिंगल आणि विपिन शर्मा या दोन्ही आयुक्तांना ही प्रतिमा जपायला जमले नाही .


सुरुवातीपासूनच राजकीय हस्तक्षेप : 90 च्या दशकापासून ठाणे महानगरपालिकेत आयुक्तांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप ठाण्यातील जाणकार करत आहेत ती चंद्रशेखर यांना देखील अशाच प्रकारचा राजकीय विरोध देखील पाहायला मिळाला आणि हीच बाब संजीव जयस्वाल यांच्या बाबतीत देखील पाहायला मिळाले शहराचा विकास करत असताना काही निर्णय हे सर्वांच्या फायद्यानुसार घ्यावे लागतात मात्र यातून दुखावली जाणारी मंडळी राजकीय फायद्यासाठी त्याचा विरोध करताना दिसून आली.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.