ETV Bharat / state

सोलापूर : उजनी धरण 50 टक्के भरले; तर वीर धरणातून नीरा नदीत 8000 क्युसेक विसर्ग

author img

By

Published : Aug 2, 2021, 12:17 PM IST

Updated : Aug 3, 2021, 7:31 AM IST

मागील 10 ते 12 दिवसांच्या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यातील घाट माथ परिसरात पावसाची संततधार पाहायाला मिळाली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये हे 80 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर त्या धरणातून उजनी धरणात पाणी सोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ujani dam filled with 50 percent water
उजनी धरण 50 टक्के भरले

पंढरपूर (सोलापूर) - पुणे जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले. त्यामुळे उजनी जलाशयात आता 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर सातारा जिल्ह्यातील संततधारेमुळे वीर धरणातून नीरा नदीत 8000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. तसेच दौंडमधून 12300 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला आहे. त्यामुळे उजनी धरण तीन दिवसांमध्ये 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्याची माहिती जलसंधारण विभागाकडून देण्यात आली आहे.

धरणाची दृश्ये

आणखी भरण्याची शक्यता -

मागील 10 ते 12 दिवसांच्या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्यातील घाट माथ परिसरात पावसाची संततधार पाहायाला मिळाली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये हे 80 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर त्या धरणातून उजनी धरणात पाणी सोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उजनी जलसाठ्यात 50 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर लवकरच दौंड येथील विसर्गामुळे उजनी 60 टक्के भरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भीमा नदी पात्रात पाच हजार क्युसेस पाणीसाठा -

सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे वीर धरणातून नीरा नदी पात्रात सुमारे 20 हजार क्युसेक विसर्ग केला होता. त्यामुळे सध्या भीमा नदी पात्रात 5000 क्युसेक विसर्ग पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंधारण विभागाने दिली आहे. उजनी धरणात जलद गतीने पाणीसाठा उपलब्ध होत असल्यामुळे उजनी धरण येत्या काळात 100 टक्के भरण्याची शक्यता ही जलसंधारण विभागांनी वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

हेही वाचा - मनसेकडून कोकणातील पुरग्रस्त बांधवांना मदत, राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे सैनिक सरसावले

Last Updated :Aug 3, 2021, 7:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.