सातारा - नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले, धरणे आदींमधील पाणी गढूळ झालेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव याला अपवाद ठरला आहे. या तलावातील पाणी नितळ आहे. निसर्गाची देण असलेल्या कास तलावाची भौगोलिक रचना हे यामागील खरे रहस्य आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील बहुतांश जलस्त्रोत गढूळ झालेले पाहायला मिळतात. तांबड्या रंगाचे पाणी दिसते. हे नेहमीच्या पावसाळ्यातील सर्वसाधारण चित्र असते. मात्र साताऱ्याला पाणीपुरवठा करणारा कास तलाव याला नेहमीच अपवाद राहिला आहे. कास तलावातील पाणी कायम निळेशार, नितळ असतं. काही पर्यावरण तज्ज्ञांच्या माध्यमातून यामागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे, त्याबाबतचा हा विशेष वृत्तांत..
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासचं पाणी नितळ कसे? पर्यावरण तज्ज्ञांनी केला 'हा' खुलासा
सातारा - नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले, धरणे आदींमधील पाणी गढूळ झालेले आपल्याला पाहायला मिळते. परंतु सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव याला अपवाद ठरला आहे. या तलावातील पाणी नितळ आहे. निसर्गाची देण असलेल्या कास तलावाची भौगोलिक रचना हे यामागील खरे रहस्य आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर जिल्ह्यातील बहुतांश जलस्त्रोत गढूळ झालेले पाहायला मिळतात. तांबड्या रंगाचे पाणी दिसते. हे नेहमीच्या पावसाळ्यातील सर्वसाधारण चित्र असते. मात्र साताऱ्याला पाणीपुरवठा करणारा कास तलाव याला नेहमीच अपवाद राहिला आहे. कास तलावातील पाणी कायम निळेशार, नितळ असतं. काही पर्यावरण तज्ज्ञांच्या माध्यमातून यामागील रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'ने केला आहे, त्याबाबतचा हा विशेष वृत्तांत..