ETV Bharat / state

Prithviraj Chavan Threat Email : पृथ्वीराज चव्हाणांना धमकीचा ईमेल; संभाजी भिडेंच्या अटकेची केली होती मागणी

author img

By

Published : Jul 30, 2023, 3:14 PM IST

Threat To Prithviraj Chavan
Threat To Prithviraj Chavan

संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ईमेल आला (Prithviraj Chavan Threat Email) आहे. त्यामुळे पोलिसांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी एकाला नांदेडमधून अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.

सातारा : राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेल द्वारे धमकी देण्यात (Prithviraj Chavan Threat Email) आली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद झाली आहे. दरम्यान, धमकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा : राष्ट्रपित्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माणूस बाहेर कसा फिरू शकतो?, असा सवाल करताना पृथ्वीराज चव्हाण संतप्त झाले होते. संभाजी भिडे या व्यक्तिला ताबडतोब अटक करा, अशी मागणी चव्हाण यांनी सभागृहात केली होती. चव्हाण यांच्या मागणीला काँग्रेसच्या इतर आमदारांनी पाठिंबा दिला.

काँग्रेस आक्रमक : भिडे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस सदस्य आक्रमक झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मागणीची दखल घेतली. तसेच माहिती घेऊन या प्रकरणी उचित कारवाई केली जाईल, असे नार्वेकर यांनी आश्वासित केले होते. मोहनदास यांचे खरे वडील करमचंद गांधी नसून मुस्लिम जमीनदार असल्याचे धक्कादायक विधान संभाजी भिंडे यांनी केले होते. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्याची दखल घेत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेच. तसेच पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेसने दिलेल्या तक्रारीच्या आधारे अमरावतीमधील राजापेठ पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेसने केली तक्रार : संभाजी भिडे यांनी गुरुवारी सायंकाळी शहरातील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली होती. भिंडे यांनी महात्मा गांधी यांचे वडील करमचंद गांधी यांच्या चारित्र्यावर आक्षेप घेतला होता.

काय म्हणाले होते भिडे?: "मोहनदास हे चारित्र्य संपन्न व शिलवान करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला" असे वक्तव्य भिडे यांनी केले होते.

भिडेंची सभा उधळण्याचा आंबेडकरी संघटनांचा प्रयत्न : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असणारे संभाजी भिडे यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न आंबेडकरी कार्यकर्त्यांनी केला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो महापुरुष हुतात्मा झाले. राष्ट्रध्वज, संविधान, राष्ट्रगीत, महापुरुष, महिलांचा यांचा वारंवार अपमान भिडे यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंवर कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकरी संघटनांनी संभाजी भिडेंची केली होती.

हेही वाचा - Eknath Shinde on Thane Nashik Highway: मुख्यमंत्र्यांनी ठाणे-नाशिक महामार्गाची केली पाहणी, प्रशासनाला 'हे' दिले आदेश

Sanjay Raut on opposition MPs Manipur: मणिपूरबाबत खालच्या थराला जाऊन भाजपाची टीका म्हणजे आदिवासींचा अपमान-संजय राऊत

Car enetered in CM Convoy: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आलिशान कार का घुसविली? जामिन मिळालेल्या आरोपीने सांगितले 'हे' कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.