ETV Bharat / state

'सामाजिक मूल्य लक्षात घेऊन सज्जनगड देवस्थान सुरू करा'

author img

By

Published : Oct 18, 2020, 8:07 PM IST

सरकारने सरसकट सर्व देवस्थान बंद ठेवले, हे योग्य नाही. धार्मिकस्थळांचे सामाजिक मूल्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ही देवस्थाने सुरू करावीत, अशी मागणी रामदास स्वामी यांच्या वंशजांनी केली आहे.

priest damands to open sajjangad temple satara
सज्जनगड देवस्थान

सातारा - समाजाला लागणारे आत्मबल, मन:शांती हे या देवस्थानच्या माध्यमातून मिळते. नैतिकमूल्ये, सेवाभाव, सामाजिक भान याबाबतच्या चेतना धार्मिकस्थळीच मिळत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही देवस्थाने सुरू करावीत, अशी मागणी रामदास स्वामी यांच्या वंशजांनी केली आहे. सज्जनगडावरील रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष सूर्याजी स्वामी ऊर्फ बाळासाहेब स्वामी यांनी ही मागणी केली आहे.

सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामी संस्थानला गेल्या 350 वर्षांपासूनची परंपरा आहे. महाराष्ट्रतच नव्हे तर, महाराष्ट्राच्या बाहेरील व देशातील तसेच परदेशातील देखील या संस्थानाबद्दल लोकांना श्रद्धा आहे. अशी देवस्थाने कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत. ती उघडण्याचा सरकारचा काही मानस नाही, हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

धार्मिक स्थळांचे सामाजिक मुल्य लक्षात घेऊन सज्जनगड देवस्थान सुरू करा
या संस्थानांमुळे लोकांमध्ये सेवाभाव निर्माण होतो. हे संस्थान केवळ देवस्थान किंवा पर्यटनस्थळ नाही. संस्थानावरील सर्व विश्वस्त उच्चशिक्षित आहेत. त्यांचा उदरनिर्वाह सज्जनगड देवस्थानावर अवलंबून नाही. या संस्थानावर काही कुटुंबांची उपजीविका चालू आहे. काही लोकांचे व्यवसाय, नोकरी देवस्थानावर अवलंबून आहे, असे सांगून बाळासाहेब स्वामी म्हणाले. उंचस्थानावर जी देवस्थाने आहेत. तेथे नोकरी-व्यावसाय करणारे लोक स्थान सोडून अन्यत्र कोठे जाऊ शकत नाहीत. त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. या सर्वांचा विचार होणे गरजेचे आहे. सरकारने सरसकट देवस्थान बंद ठेवले हे योग्य नाही. धार्मिक स्थळांचे सामाजिक मूल्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ही देवस्थाने खुली करावीत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.