ETV Bharat / state

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगलीत 'आत्मक्लेश जागर' आंदोलन

author img

By

Published : Dec 4, 2020, 1:41 AM IST

Swabhimani's agitation in sangli
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आत्मक्लेश जागर आंदोलन करण्यात येत आहे. संपूर्ण रात्र जागून हे आंदोलन करण्यात येणार आहे.

सांगली - दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आत्मक्लेश जागर आंदोलन करण्यात येत आहे. संपूर्ण रात्र जागून हे आंदोलन करण्यात येणार आहे.

स्वाभिमानीचे "आत्मक्लेश जागर"

केंद्र सरकारकडून कृषी कायदा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या कायद्याला विरोध करण्यासाठी देशातले लाखो शेतकरी महिला घेराव घालून आंदोलन करत आहेत, मात्र शेतकऱ्यांवर पोलिसांकडून अत्याचार सुरू असल्याचा आरोप करत, कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीमध्ये आत्मक्लेश जागर आंदोलन करण्यात येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही आंदोलनात सहभाग

सांगली शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील पाठिंबा दिला असून, राष्ट्रवादीचे नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले आहेत.

शेकोटी आणि खर्डा भाकरी

दिल्लीत कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याला पाठिंबा देण्यासाठी सांगलीमध्ये स्वाभिमानीचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शेकोटी पेटवून आणि खर्डा भाकरी खाऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात आला.

अन्यथा रस्त्यावर उतरू

दरम्यान यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने दिल्लीतील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवावा, तसेच तातडीने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. शेतकरी कायदे रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.