ETV Bharat / state

समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात वज्रमूठ आवळा - उपमुख्यमंत्री अजित पवार

author img

By

Published : May 17, 2022, 2:04 PM IST

Updated : May 17, 2022, 2:27 PM IST

dcm ajit pawar say come together against tendency to create a rift in the society in sangli
उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्रातील आणि देशातील सामाजिक वातावरण बघितलं, तर आज महाराष्ट्राला यशवंत विचारांची गरज आहे. जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. या मंडळींना वेळीच रोखले पाहिजे यासाठी समाजाला जागृत करण्याची गरज असून त्यासाठी यशवंत विचार गरजेचे आहे, तसेच या विचारांना पुढे नेऊन,नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावे लागणार आहे. यातूनच समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन वज्रमूठ आवळली पाहिजे,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सांगली - महाराष्ट्राला आज यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची गरज असून समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत वज्रमूठ आवळली पाहिजे,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच मी नास्तिक असल्याचे सांगत राजकारण्यांनी मोजून मापून बोलावं लागते, नाही तर दिवसभर चव्हाण साहेबांच्या समाधीवर बसावे लागतंय, हे आपण अनुभवल्याची आठवण ही अजित पवारांनी काढली. मिरज मध्ये पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात वज्रमूठ आवळा
यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार सोहळा - मिरजेतील यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा "यशवंतराव चव्हाण भुषण पुरस्कार यंदा राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीर झाला होता. रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मिरजेत हा पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला.या प्रसंगी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम,महापौर दिग्विजय सूर्यवंशी,शिवसेनेचे आमदार अनिल बाबर,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील,काँग्रेसच्या महिला नेते जयश्रीताई पाटील,राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर. आर.पाटील,समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.समाजात दरी करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात वज्रमूठ आवळा - महाराष्ट्रातील आणि देशातील सामाजिक वातावरण बघितलं, तर आज महाराष्ट्राला यशवंत विचारांची गरज आहे. जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. या मंडळींना वेळीच रोखले पाहिजे यासाठी समाजाला जागृत करण्याची गरज असून त्यासाठी यशवंत विचार गरजेचे आहे, तसेच या विचारांना पुढे नेऊन,नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावे लागणार आहे. यातूनच समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन वज्रमूठ आवळली पाहिजे,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.राजकारणात जपून बोललं पाहिजे - आपण नास्तिक असल्याचे यावेळी अजित पवार यांनी जाहीर भाषणांमध्ये स्पष्ट करत आग्रहास्तव आपण देवाच्या दर्शनाला जातो. ती आपले हिंदू संस्कृती आहे,असं सांगत,कार्यक्रमाचे संयोजक विठ्ठल पाटील यांनी त्यांच्या भाषणातून केलेल्या विधानांचा धागा पकडत, मंत्री अजित पवार म्हणाले,काही गोष्टी जरी सत्य असल्या तरी,बोलताना त्या मोजून-मापून बोलाव्या लागतात,नाहीतर एखादा शब्द चुकून गेला तर,आपल्याला माहित आहे,काय होतं. दिवसभर तिकडे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीपुढे बसावे लागते,हे आपण अनुभवले, अशा त्यांनी केलेल्या आत्मक्लेश प्रसंगाची आठवण अजित पवारांनी बोलून दाखवली.
Last Updated :May 17, 2022, 2:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.