ETV Bharat / state

कोकणची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी आंबा प्रक्रिया उद्योगाला नवसंजीवनीची आवश्यकता

author img

By

Published : May 17, 2022, 3:47 PM IST

mango processing industry
हापूस आंबा

कोकण म्हणजे जणू प्रति काश्मीरच. निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. याच कोकणचे वैशिष्ठ्ये म्हणजे इथला हापूस आंबा. सातासमुद्रापार पोहचलेला या फळांच्या राजावरच कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ( mango processing industry ) त्यासाठी प्रक्रिया उद्योगाला नवसंजीवनी देण्याची आवश्यकता आहे.

रत्नागिरी - कोकण म्हणजे जणू प्रति काश्मीरच. निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. याच कोकणचे वैशिष्ठ्ये म्हणजे इथला हापूस आंबा. सातासमुद्रापार पोहचलेला या फळांच्या राजावरच कोकणची अर्थव्यवस्था ( Konkan economy ) अवलंबून आहे. हापूससह फणस, काजू कोकम ही सुद्धा कोकणची वैशिष्ट्ये. मात्र या फळांवर प्रकिया करणारे उद्योग कोकणात तसे मोठ्या प्रमाणात बहरलेले नाहीत.

mango processing industry
हापूस आंबा

कोरोना मुळे उद्योगाला फटका - त्यातल्या त्यात हापूसच्या प्रक्रिया उद्योगाने थोडीफार झेप घेतलेली आहे. त्यातच निसर्गाच्या चक्रावर हा उद्योग अवलंबून आहे. त्यात कॅनिंगसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची कमतरता, सरकारचे अनुदान धोरण, दर्जा टिकवण्यासाठी होणारा खर्च, वाढता उत्पादन खर्च यामुळे कॅनिंग उद्योग अडचणीत आहे. त्यात गेली 2 वर्ष कोरोनाचा फटका या व्यवसायाला देखील बसला. पण तरीही अनेकांनी हा प्रकिया उद्योग मोठ्या कष्टाने सुरू ठेवला आहे. व्यवसायातील सातत्य, नव्या बाजारपेठांचा शोध, गुणवत्ता, धाडस व शोधक वृत्ती या गुणांच्या जोरावरच काहींनी आपली या उद्योगातील यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.

mango processing industry
आंबा

हेही वाचा - Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीत सापडलेली रचना शिवलिंग नव्हे, ते तर कारंजे : AIMIM प्रमुख ओवेसींचा दावा

विदेशात मोठ्या प्रमाणात पल्पचे स्थलांतर - रत्नागिरी जिल्ह्यात छोटे मोठे जवळपास 50 पेक्षा जास्त आंबा कॅनिंग कारखाने/प्रकल्प आहेत. याबाबत बोलताना आंबा प्रक्रिया व्यवसायिक आनंद देसाई यांनी सांगितले की आंबा प्रक्रिया कारखान्यात मँगो पल्प, आंबा मावा तयार केला जातो. साधारणतः एका कॅनिंग प्रकल्पामध्ये 25 ते 200 जणांना रोजगार मिळतो. रत्नागिरी येथून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, अमेरिका, दुबई, लंडन आदी ठिकाणी पल्प निर्यात केला जातो.

या उद्योगाची वैशिष्ट्ये - एप्रिलच्या मध्यात कॅनिंग व्यवसाय सुरू होतो. पल्प बनविण्यासाठी तयार फळांचा वापर होतो. दर्जेदार फळे निवडून रस काढला जातो. रसातील साखरेचे प्रमाण तपासण्यात येते. पल्पमधील ब्रिक्स टक्केवारी 24 पर्यंत ठेवली जाते. प्रक्रिया पार पडल्यानंतर पल्प डबा बंद केला जातो. गोदामात या डब्यांना गंज लागू नये यासाठी काळजी घ्यावी लागते. त्यासाठी उन्हाळ्यात व पावसाळ्यात तापमान व बाष्प नियंत्रित केले जाते. याचा दर प्रति किलो 180 ते 200 रु. असतो.

mango processing industry
आंबा

हेही वाचा - Old man hit by bike : थरारक.. रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला भरधाव मोटरसायकलने उडवले

प्रक्रिया उद्योगांची कमकरता - कोकणामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असले, तरी आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग फारसे नाहीत. अडचणी आल्या तरी त्यावर मात करत या उद्योगात अनेकांनी यायला हवे आणि आंबा प्रकिया (कॅनिंग) व्यवसाय बहारायला हवा.

हेही वाचा - नौदलला मिळाली मोठी ताकद; भारतीय बनावटीच्या INS सुरत व उदयगिरी युद्धनौकांचे जलावतरण, 'या' आहेत विशेषतः

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.