ETV Bharat / state

गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात; रेखणीच्या कामांना वेग

author img

By

Published : Aug 30, 2019, 5:37 PM IST

Updated : Aug 30, 2019, 11:08 PM IST

गणरायाच्या आगमनाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मूर्ती शाळांमधील लगबग वाढली आहे. मातीकाम जवळपास पूर्ण झाले असून आता रंगकाम आणि रेखणीच्या कामांना वेग आला आहे.

गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात रेखणीच्या कामांना वेग

रत्नागिरी - गणरायाच्या आगमनाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मूर्ती शाळांमधील लगबग वाढली आहे. मातीकाम जवळपास पूर्ण झाले असून आता रंगकाम आणि रेखणीच्या कामांना वेग आला आहे. रत्नागिरीतील रमेश बेलवलकर हे व्यवसायाने सोनार आहेत. परंतू मूर्तींना रेखणी कारणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात; रेखणीच्या कामांना वेग

गणेशोत्सवाच्या चार ते पाच दिवस अगोदर रेखणीची कामे सुरु होतात. गणरायाची रंगरंगोटी किंवा मुर्तीचं कुठलेही काम भराभरा होते. मात्र, डोळ्यांची अदाकारीसाठी रेखणीच्या कालाकारांना विशेष कष्ट घ्यावे लागतात. गेली २५ वर्ष बेलवलकर गणपतीचे डोळे साकारत आहेत. एका दिवसात अनेक गणपतींची रुपे डोळ्यांच्या माध्यमातून ते जिवंत करतात. रेखणीचे काम करताना संयम आणि एकाग्रता महत्त्वाची असल्याचे बेलवलकर सांगतात.

तर, मूर्ती रेखणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून पारंपरिक गणरायाच्या मूर्तींना मागणी जास्त असल्याचे रत्नागिरीतील मूर्तिकार विजयानंद पालकर म्हणतात. सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या 'विठू माऊली' या मालिकेमुळे विठुरायाच्या रुपातील गणेशमूर्तीचीही भाविकांकडून यावर्षी मागणी झाल्याचे पालकर सांगतात.

Intro:गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात
रेखणीच्या कामांना वेग

रत्नागिरी, प्रतिनिधी

गणरायाच्या आगमनाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत.. त्यामुळे मूर्ती शाळांमधील लगबग वाढली आहे. मातीकाम जवळपास पूर्ण झालं असून आता रंगकामाला वेग आला आहे. यातील महत्वाचं आणि अतिशय कलाकुसरीचं काम म्हणजे मूर्तीची रेखणी. गणपतीच्या मुर्तीमध्ये जीव ओतणारी हि रेखणीची कला साकारणे म्हणजे अवघड काम..
गणेशोत्सवाच्या चार ते पाच दिवस अगोदर ही रेखणीची कामे सुरु होतात. माणसाच्या डोळ्यात जसे भाव असतात त्याचप्रमाणे गणरायाचे हे डोळे साकारले जातात. अगदी काही मिनिटात हे डोळे साकारले जातात. ब्रशच्या कुंचल्यातून रंगाचे अलगद फटकारे मारत रेखणीचं हे काम केलं जातं. गणरायाची रंगरंगोटी किंवा मुर्तीचं कुठलंही काम पुर्ण होवू दे, मात्र या डोळ्यांची अदाकारी या रेखणीच्या कालाकारांनी केली नाही तर ती मुर्तीच पुर्ण होत नाही. तन मन लावून या रेखणीचं काम करावं लागतं. डोळ्यातील वेगवेगळ्या शेड या मूर्तीला या कलाकारांनी दिल्यानंतर खऱ्या अर्थांने गणरायाची हि सुबक आणि कोरीव मुर्ती डोळ्यात भरते.
रेखणी काढणारे कलाकार हे काही ठिकाणी फक्त रेखणीचंच काम करतात.. रत्नागिरीतले रमेश बेलवलकर हे त्यापैकीच एक. व्यवसायाने सोनार.. मात्र गणेशोत्सवात त्यांची खासीयत आहे ती रेखणी काढण्याची.. गेली २५ वर्ष ते गणपतीचे डोळे साकारत आहेत. एका दिवसात अनेक गणपतींची रुपे या डोळ्यांच्या माध्यमातून जिवंत करण्याचं काम रमेश बेलवलकर करतात. रेखणीचे काम करताना संयम आणि एकाग्रता महत्त्वाची असल्याचं बेलवलकर सांगतात.. दरम्यान हे काम सध्या अंतिम टप्प्यात असून पारंपरिक गणरायाच्या मूर्तींना मागणी जास्त असल्याचं रत्नागिरीतील मूर्तिकार विजयानंद पालकर यांचं म्हणणं आहे, मात्र सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या 'विठू माऊली' या मालिकेमुळे विठुरायाच्या रूपातील गणेशमूर्तीचीही भाविकांकडून यावर्षी मागणी झाल्याचं पालकर सांगतात..

Byte-1- रमेश बेलवलकर, रेखणी साकारणारे

2) विजयानंद पालकर, मूर्तीकार

Body:गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात
रेखणीच्या कामांना वेगConclusion:गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात
रेखणीच्या कामांना वेग
Last Updated :Aug 30, 2019, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.