ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवारांच्या हातातील कठपुतळी - निलेश राणे

author img

By

Published : Dec 25, 2019, 3:21 PM IST

Updated : Dec 25, 2019, 6:58 PM IST

राज्यात सध्या असलेले सरकार कोणाच्याच हिताचे नाही. त्यामुळे हे सरकार फार दिवस टिकणार नाही. सरकारने सर्व प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम केले असून कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना फसवले आहे. त्यामुळे शेतकरी नाराज असल्याची टीका निलेश राणे यांनी केली.

Nilesh Rane
निलेश राणे

रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कठपुतळी असल्याचा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे. राज्याचे मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे नेमके कुठे अडकले आहे, मंत्रीपद, शेतकऱ्यांना कर्जमाफी आदी विषयांबाबत माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी खास बातचीत केली. यावेळी निलेश राणे यांनी सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

ईटीव्ही भारतने माजी खासदार डॉ. निलेश राणे यांची घेतलेली विशेष मुलाखत

हेही वाचा... चंद्रपुरात आश्रम शाळेच्या अधीक्षकाची शाळेच्या आवारात आत्महत्या

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, काही प्रमुख नेत्यांना जी खाती हवी आहेत ती मिळत नसल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांशी पटत नसल्याने, प्रत्येक जण मला काय मिळणार? हा विचार करत असल्याने, त्यावरच सगळे अडकले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे या सरकारमध्ये बिलकूल वजन नाही. त्यामुळेच पवार साहेबानी त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कठपुतळी असल्याचा घणाघात यावेळी निलेश राणेंनी केला.

हेही वाचा... 'शिवभोजन' थाळीचं ठरलं; १० रुपयात मिळणार 'हे' पदार्थ

उद्धव ठाकरे यांचे आडनाव काढल्या नंतर उद्धव ठाकरे म्हणजे कोण, हे सर्व महाराष्ट्राला कळले पाहिजे. बाळासाहेबाचे नाव असल्यानेच उद्धव ठाकरेंना एक वलय मिळाले आहे. बाकी त्यांचे स्वतःचे कर्तृत्व काय आहे, अशा शब्दात निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. शिवसेनेचे जे काही आमदार निवडून येतात ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून येतात. त्याचे श्रेय उद्धव ठाकरे यांना नाही, असेही राणे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... मागोवा २०१९ - सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या व्यापार क्षेत्रातील दहा घडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षात देखील नेमके कोणाला मंत्रिपद द्यायचे, या मुद्द्यावर निर्णय नाही. उद्धव ठाकरे यांना जो सर्वात जास्त पैसे देतो, त्यालाच ते मंत्रिपदी बसवतात. जो मोठ्या बॅगा देईल, त्याला मंत्रिपद हा उद्धव ठाकरे यांचा जुना स्वभाव असल्याचा खळबळजनक आरोपही निलेश राणे यांनी केला आहे.

हेही वाचा... VIDEO: जाणून घ्या 2019 मधील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडी...

Intro:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कटपुतली - निलेश राणे
जो मोठ्या बॅगा देईल, त्यालाच उद्धव ठाकरे मंत्रिपद देणार - निलेश राणे

मला काय मिळणार यावरच मंत्रिमंडळ विस्तराचं सगळं अडकलं आहे - निलेश राणे



रत्नागिरी, प्रतिनिधी

मंत्रिमंडळ विस्तार, मंत्रिपद, कर्जमाफी याबाबत माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी सरकारवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचयावर जोरदार टीका केली आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले की, प्रमुख नेत्यांना जी खाती हवी आहेत ती मिळत नसल्याने मला हे तुला हे असं चाललेलं आहे. त्यात तिन्ही पक्षातील नेत्यांचं एकमेकांशी पटत नेल्याने मला काय मिळणार यावरच सगळं अडकलं आहे. याच्यातच अनेक दिवस निघून गेले. या लोकांना महाराष्ट्राच्या हिताचं काही पडलेलं नाही. या अगोदर देखील अनेक तारखा ह्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आल्या आहेत.. आताही ही तारीख पुढेच जाईल.

मुख्यमंत्र्यांचं वजन या सरकारमध्ये नाही, त्यामुळेच पवार साहेबानी त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कटपुतली आहेत. उद्धव ठाकरे यांना आपण कसंही हाताळू शकतो, म्हणूनच पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदी बसवलं आहे. पवार साहेब जे सांगणार तेच उद्धव ठाकरे करणार.शरद पवारांनी मागून चावी दिली कि उद्धव ठाकरे काहीही करतील. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या हिमतीवर आजपर्यंत महाराष्ट्रात काय केलं. ठाकरे आडनाव काढलं तर उद्धव ठाकरे कोण हेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे.बाळासाहेबाचं नाव असल्यानेच उद्धव ठाकरेंना वलय बाकी त्यांचं कर्तृत्व काय आहे. शरद पवार साहेबांना अशीच माणसं हवी आहेत जे काही करूच शकत नाही त्यांच्यासमोर. शिवसेनेचे जे काही आमदार निवडून येतात ते बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर निवडून येतात. हे श्रेय उद्धव ठाकरे यांचं नाही.

मुख्यमंत्र्यांच्या पक्षात देखील कोणाला मंत्रिपद द्यायचं ह्याच्यावर पण निर्णय नाही. उद्धव ठाकरे यांना जो सर्वात जास्त पैसे देतो त्याला ते मंत्रिपदी बसवतात. जो मोठ्या बॅगा देईल, त्याला मंत्रिपद हा उद्धव ठाकरे यांचा जुना स्वभाव. शिवसेनेत असताना आमच्या साहेबांचा जो काही वाद झाला तो यावरूनच, तुम्ही पैसे घेऊन तिकीट देऊ नका, मंत्रिपद देऊ नका असं साहेबांचं म्हणणं होते, पण त्यांना ते मान्य नव्हतं त्यामुळेच आम्ही बाजूला झालो.. पण त्यांची ही सवय अजून बदलेली नाही,असा जोरदार टिका निलेश राणे यांनी केली आहे.

सरकार कोणाच्या हिताचं नाही त्यामुळे हे सरकार फार दिवस टिकणार नाही. या सरकारने सर्व प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम केलं. कर्जमाफीबाबत सरकारने शेतकऱ्यांना फसवलं आहे. शेतकरीऱ्याना जे आश्वासन दिलं होतं, त्यातील काहीही या सरकारने केलं नाही त्यामुळे शेतकरी नाराज असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे..

याच संदर्भात माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर..Body:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कटपुतली - निलेश राणे
जो मोठ्या बॅगा देईल, त्यालाच उद्धव ठाकरे मंत्रिपद देणार - निलेश राणे

मला काय मिळणार यावरच मंत्रिमंडळ विस्तराचं सगळं अडकलं आहे - निलेश राणेConclusion:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार यांच्या हातातील कटपुतली - निलेश राणे
जो मोठ्या बॅगा देईल, त्यालाच उद्धव ठाकरे मंत्रिपद देणार - निलेश राणे

मला काय मिळणार यावरच मंत्रिमंडळ विस्तराचं सगळं अडकलं आहे - निलेश राणे
Last Updated :Dec 25, 2019, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.