ETV Bharat / state

वादळग्रस्त तालुक्यातील वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल - राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

author img

By

Published : Jun 10, 2020, 9:11 PM IST

Nisarga cyclone disaster
निसर्ग चक्रीवादळ

पुढील दोन दिवसात मंत्रिमंडळात या नुकसान संदर्भात विचारविनिमय करून नवीन गाईडलाईन्स तयार करण्यात येणार आहेत.

पेण (रायगड) - निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे नगरविकास, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पेण तालुक्यातील वादळग्रस्त भागाची पाहणी करून तालुक्यातील वीज पुरवठा लवकरच सुरळीत होईल असे आश्वासन दिले.

यावेळी त्यांनी पेण प्रांत कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरण कंपनीचा झालेल्या मोठ्या नुकसानाविषयी माहिती देताना सांगितले, की नव्याने पोल व डिपी उभी करणं अथवा डीपी बसवणे हे सहज शक्य आहे, परंतु जुने साहित्य वापरून त्याची पुनर्बांधणी करणे खूप धोक्याचे आहे. कारण या चक्रीवादळाने पेणसह, श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, अलिबाग या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलांची झालेली पडझड ही पडझड मोठ्या प्रमाणात आहे. तेथे पोल पुन्हा उभे करणे खूप जिकिरीचे काम आहे, त्यातच कोरोनामुळे मनुष्यबळ इतर जिल्ह्यातून बोलावणं कठीण झालेल आहे. कारण ज्याप्रमाणे महावितरण कंपनीचे नुकसान झालेले आहे त्या प्रमाणात मनुष्यबळ कमी आहे. कमी मनुष्यबळामुळे पोल उभे करणे डिपी उभ्या करणे कठीण होऊन बसले आहे, तरी देखील ग्रामस्थांच्या मदतीने आणि महावितरण कंपनीच्या असलेल्या मनुष्यबळाच्या जोरावर एकूण चोवीस स्विचींग उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले आहे. लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल. यामध्ये उच्च दाब वाहिनी २६२ पैकी १६७ (रोहित्र) डीपी ६७६३ पैकी २८९८ तर १९०५ गावांपैकी ८०४ गावांमध्ये आजच्या घडीला वीज पोहोचली आहे, सध्याच्या स्थितीला ५१ ठेकेदारांचे ९४२ तर महावितरण कंपनीचे १४४२ कर्मचारी काम करत आहेत. रायगड जिल्ह्याचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी ७४६ अधिक मनुष्यबळ नाशिक, ठाणे, नवी मुंबई, कल्याण व वाडा येथून रायगडला नियुक्त केलेला आहे. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पेणसह रायगड जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत होईल, असे प्रसारमाध्यमांना सांगितले. राज्यमंत्र्यांना महावितरण कंपनीला वीज जोडणीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या कमतरते विषयी विचारणा केली असता, त्यांनी साहित्याची कमतरता पडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल असे सांगितले.

जिल्ह्यातील पोल ८५०० आवश्यक पैकी २३६९ उपलब्ध (रोहित्र) २६५ आवश्यक पैकी १८० उपलब्ध, विजेच्या तारा १२५० पैकी २५० किमी तारा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली.

पुढील दोन दिवसात मंत्रिमंडळात या नुकसान संदर्भात विचारविनिमय करून नवीन गाईडलाईन्स तयार करण्यात येणार आहेत. यावेळी विधान परिषदेचे कोकण आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले, की कोकणातील बागायतदारांचे नुकसान न भरून येणारे आहे. कित्येक वर्ष वाडवडिलांच्या वाढविलेल्या नारळी-पोफळीच्या आंब्यांच्या, फणसाच्या बागा जमीनदोस्त झालेले आहेत. म्हणून झाडांच्या नुकसान भरपाईचा विचार करताना झाडाचा उत्पन्न देण्याची क्षमता या बाबींचा विचार करून पंचनामे करावेत, अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच नुकसानीचे पंचनामे करताना फक्त उडालेल्या छपरांची अथवा कावळ्यांचे पंचनामे न होता घरातील भिजलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या जीवनात जीवनावश्यक वस्तूंचे देखील पंचनामे व्हावेत अशा सूचना दिलेल्या आहेत. या पत्रकार परिषदेसाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदळवाड, तहसीलदार अरुणा जाधव यांच्या सह मुख्याधिकारी अर्चना दिवे, महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता डी.आर.पाटील उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.