ETV Bharat / state

दिराबरोबर भांडण झालं तर कोण नवऱ्याला सोडतं का?, सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

author img

By

Published : Sep 15, 2019, 4:07 AM IST

हर्षवर्धन पाटील यांचे भांडण राष्ट्रवादी बरोबर होतं मग काँग्रेस का सोडली, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.

सुप्रिया सुळे

पुणे - दिराबरोबर भांडण झालं तर कोण नवऱ्याला सोडतं का? असा खोचक टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना लगावला. शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

हर्षवर्धन पाटलांवर टीका करताना सुप्रिया सुळे

हेही वाचा - कर्जमाफीची फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात गुन्हा दाखल करणार - सुप्रिया सुळे

पाटील यांचे भांडण राष्ट्रवादी बरोबर होतं मग काँग्रेस का सोडली, असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उभा करत "दिरा बरोबर भांडण झाल्यावर कोण नवऱ्याला सोडतं का" असा संसार चालतो का? असा सवाल उभा करत याबाबत मी इंदापुरात जाहिरपणे बोलणार असून मी कुणाच्या बापाला घाबरत नसल्याचेही खासदार सुळे म्हणाल्या.

हेही वाचा - पवारसाहेब तुमचं भाग्य.... बरं झालं तुम्हाला मुलगा नाही - सुप्रिया सुळे

लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी अगदी प्रामाणिकपणे काम केल्याचे कबुली खासदार सुळेंनी दिली. मात्र, पुढील काळात असं काय घडलं कळलच नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष करुन ते टीका करू लागले. सुप्रिया सुळे व राहुल गांधी व हर्षवर्धन पाटील यांची दिल्लीत बैठक झाली, असे सांगत पाटलांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. मात्र, आमची तिघांची कधीच बैठक झाली नाही. त्यामुळे खोटं बोलून टीका करू नका अन्यथा "मी तोंड उघडले तर तुमच्या अडचणी वाढतील" असे खासदार सुळेंनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहिरपणे सांगितले.

Intro:Anc__"दिरा बरोबर भांडण झालं तर कोन नव-याला सोडतं का" हर्षवर्धन पाटलांचा दिर राष्ट्रवादी कॉग्रेस तर नवरा कॉग्रेस आहे असं असताना राष्ट्रवादी कॉग्रेस..व कॉग्रेसवर ऐवढी टिका करुन हर्षवर्धन पाटील भाजपात गेलेत आणि हेच मी इंदापुरात जाऊनही बोलणार आहे मी नाही कुनाच्या बापाला घाबरत नसल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळेंनी शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपवाशिय झालेल्या हर्षवर्धन पाटलांचा चांगलाच समाचार घेतला...

लोकसभा निवडणुकीत पाटलांनी अगदी प्रामाणिक पणे काम केल्याचे कबुली खासदार सुळेंनी दिली मात्र पुढील काळात असं काय घडलं कळलच नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष करुन टिका करण्यात आली आणि सुप्रिया सुळे व राहुल गांधी व हर्षवर्धन पाटील यांची दिल्लीत बैठक झाली असे सांगत पाटलांनी राष्ट्रवादीवर टिका केली होती मात्र आमची तीघांची कधीच बैठक झाली नाही त्यामुळे खोटं बोलुन टिका करु नका अन्यथा "मला तोंड उघडायला लावु नका नाही तर तुमच्या अडचणी वाढतील" असे खासदार सुळेंनी कार्यकर्ता मेळाव्यात जाहिरपणे सांगितले.

हर्षवर्धन पाटलांचे भांडण राष्ट्रवादी बरोबर होतं मग कॉग्रेस का सोडली असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उभा करत "दिरा बरोबर भांडण झाल्यावर कोन नव-याला सोडतं का" असा संसार चालतो का असा सवाल उभा करत याबाबत मी इंदापुरात जाहिरपणे बोलणार असुन मी कुनाच्या बापाला घाबरत नसल्याचेही खासदार सुळे यांनी स्पष्ट केले.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.