ETV Bharat / state

मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये, शिवस्मारक युवा संघर्ष समितीची मागणी

author img

By

Published : Sep 26, 2020, 7:16 PM IST

Updated : Sep 26, 2020, 7:32 PM IST

पुणे
पुणे

मराठा आरक्षणावरून अनेक संघटना, संस्था आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणतीही भरती करू नये. मराठा समाजातील तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. सरकारने मराठा तरुणांवर गुन्हा दाखल करू नये. तसेच शिवस्मारकाचे काम लवकरात-लवकर सुरू करावे अशा विविध मागण्या यावेळी शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या.

पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारने कोणतीही भरती प्रक्रिया रावबू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवस्मारक युवा संघर्ष समितीने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलने केली जात आहेत.

शिवस्मारक युवा संघर्ष समितीची पत्रकार परिषद

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणतीही भरती करू नये. मराठा समाजातील तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. सरकारने मराठा तरुणांवर गुन्हा दाखल करू नये. तसेच शिवस्मारकाचे काम लवकरात-लवकर सुरू करावे अशा विविध मागण्या यावेळी शिवस्मारक युवा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आल्या.

हेही वाचा - मराठा आरक्षणप्रश्नी पुण्यातील बैठकीसाठी उदयनराजे, शिवेंद्रराजेंना विनायक मेटेंचे निमंत्रण

मराठा समाजातील मुलांच्या शिक्षण आणि नोकरीमधील आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे समाजात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. काळाकुट्ट अंधार तयार झाला आहे. हा अंधःकार सरकारने दूर करावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावे. सरकारने आरक्षण न देता कोणतीही भरती प्रक्रिया राबवल्यास याचे परिणाम वेगवेगळ्या रूपात भोगावे लागतील, असा इशारा मराठा आंदोलक धनश्री मस्के यांनी दिला आहे.

Last Updated :Sep 26, 2020, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.