ETV Bharat / state

Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आवाड यांनी राजीनामा न देता लढावे - सुप्रिया सुळे

author img

By

Published : Nov 14, 2022, 3:34 PM IST

Supriya Sule
Supriya Sule

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ( NCP MLA Jitendra Awhad ) यांनी आमदारकीचा राजीनामा देऊ ( Jitendra Awhad Don't resign ) नये असे अवाहन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule ) यांनी केला आहे. पुणे महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली यावेळी त्या बोलत होत्या.

पुणे - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड ( NCP MLA Jitendra Awhad ) यांचा त्रास कमी होण्याचे नाव घेत ( Increase in MLA Jitendra Awhad problem ) नाही. दोन दिवसांपूर्वी त्यांना वर्तकनगर पोलिसांनी मारहाणीच्या आरोपाखाली अटक केली होती. आता एका महिलेने त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप ( Jitendra Awhad accused of molestation ) केला आहे. आव्हाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम 354 अन्वये ठाण्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ( case of molestation registered against Jitendra Awhad ) करण्यात आला आहे.

आव्हाडांनी राजीनामा देऊ नये - यावर आव्हाड यांनी मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत आहे असे म्हटल आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी जितेंद्र आव्हाड यांना पक्षाच्या वतीने माझ्यावतीने आवाहन करेल की, त्यांनी राजीनामा देऊ नये. कारण मुंब्राच्या लोकांनी त्यांना विश्वासाच्या नात्याने त्यांना निवडून दिलं आहे. मंत्री असो की आमदार त्यांचं काम चांगल आहे. लोकांसाठी त्यांनी राजीनामा देऊ नये असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुणे महापालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली यावेळी त्या बोलत होत्या.

आव्हाडांनी लढाई लढली पाहिजे - यावेळी सुळे म्हणाल्या की, पक्षाच्या वतीने जयंत पाटील,अजित पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. आमची सर्वांची विनंती आहे की त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊ नये. त्यांनी लढले पाहिजे. ही लढाई खोट्या केसेसची आहे. त्यामुळे त्यांनी लढाई लढली पाहिजे असे म्हणत त्यांनी सत्यमेव जयतेचा उल्लेख केला. आपण पाहिलं तर, सकाळी एक व्हिडियो आला. नंतर दुसरा व्हिडीओ आला. व्हिडियोमध्ये आव्हाड म्हणत आहे की, कशाला गर्दीत आली, जा घरी. त्या व्हिडियोमध्ये मुख्यमंत्री दिसत आहे.

राजकारणाची पातळी खालावली - अनेक लोक दिसत आहे. मोठी गर्दी दिसत आहे. हा जो आरोप झाला तेव्हा मला प्रचंड वेदना झाल्या. कारण मी देखील एक महिला आहे. दुर्दैव या गोष्टीचा आहे की, राजकारणाची पातळी एवढी खालावली आहे का? मुख्यमंत्री, खासदार एवढी पोलीस यंत्रणा असताना असा आरोप होत आहे. याच दुर्दैव वाटत असे यावेळी सुळे म्हणाल्या.अशा घटना पाहिल्या की ज्यांना खरच गरज आहे.अशा महिलांवर अन्याय होतो. त्यामुळे यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं अस देखील सुळे म्हणाल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.