ETV Bharat / state

Nana Patole On Narendra Modi : पंतप्रधान पान टपरीवर असल्यासारखे बोलत होते; नाना पटोलेंची मोदींवर टीका

author img

By

Published : Feb 11, 2023, 7:40 PM IST

Nana Potole On Narendra Modi
नाना पटोले

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील भाषणावरून जोरदार टीका केली आहे. लोकसभेत कॉंग्रेसकडून अदानी समूहाबद्दल उपस्थित केल्या गेलेल्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदी पान टपरीवर उभे राहून भाषण दिल्यासारखे बोलत होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेत भाषण दिले. पंतप्रधानांच्या भाषणावरून कॉंग्रेसने जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधींनी लोकसभेत उपस्थित केलेले सर्व प्रश्न मोदींनी फेटाळून लावले. तुम्ही पंतप्रधान मोदींचे भाषण पाहिले असेल तर ते पान टपरी उभे राहून बोलत असल्यासारखे होते, अशी खोटक टीका त्यांनी केली. तसेच तुम्ही अदानीचे चौकीदार आहात की 140 कोटी लोकांचे?, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

पटोलेंचे पंतप्रधानांवर टीकास्त्र : अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत खासदार राहुल गांधी तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अदानी समूहाच्या गैरव्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत भाषण देत असताना पान टपरीवर असल्यासारखे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणाले होते की, मी चौकीदार आहे. यामुळे 140 करोड देशाचे चौकीदार आहेत की अदानींचे चौकीदार आहेत, याचे तुम्हाला देशाला उत्तर द्यावेच लागेल, असे पटोले म्हणाले आहेत.

भाजपकडून लोकशाहीची हत्या : पटोले पुढे म्हणाले की, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी समूहाबद्दल जे प्रश्न उपस्थित केले होते. ते प्रश्न रेकॉर्डवरून काढले गेले. लोकशाहीची हत्या करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायलायने देखील त्यांची भूमिका मांडली आहे की, सेबी व आरबीआय अदानी समूहाच्या प्रकरणात काय करत होती? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे.

सरकारमध्ये मोठा घोटाळा : नाना पटोले म्हणाले की, एलआयसी व बॅंकेमध्ये असलेले पैसे हे सामान्य जनतेचे आहेत. सामान्य जनतेच्या मेहनतीच्या पैश्यांची सुरक्षेऐवजी तुम्ही हे पैसे तुमच्या मित्रांना देत आहात. याचे उत्तर तुम्हाला द्यावाच लागेल. एलआयसीने आजच जाहीर केले की, आम्ही आमचे शेअर परत घेत आहोत, यावरून असे दिसून येते की, काही तरी मोठा घोटाळा झालेला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

राहुल गांधींची टीका : खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकसभेतील भाषणावर टीका केली होती. ते म्हणाले की, संसदेत मी काल उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर पंतप्रधानांनी कुठलेही स्पष्ठीकरण दिलेले नाही. आम्ही अदानींच्या गैरव्यवहाराबाबत चौकशीची मागणी केली होती. संसदेत पंतप्रधान मोदी चौकशीबाबत काहीच बोलले नाहीत. जर ते मित्र नसतील तर चौकशी व्हायला हवी असे पंतप्रधानांनी सांगायला हवे होते. यावरून हे स्पष्ट आहे की पंतप्रधान गौतम अदानी संरक्षण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अदानींचे संरक्षण होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा : NCP Anil Deshmukh in Nagpur : तब्बल 21 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अनिल देशमुख स्वगृही नागपुरात दाखल; अभूतपूर्व जल्लोषात स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.