ETV Bharat / state

..तर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील; चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

author img

By

Published : Feb 5, 2020, 4:09 PM IST

Updated : Feb 5, 2020, 4:34 PM IST

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन 100 दिवस उलटले असताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी वर्तवलेल्या भाकितामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

chandrkant patil
chandrkant patil

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत भाजपने विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. कोणी कोणाचा विश्वासघात केला हे जनता ठरवेल, असे ते म्हणाले. राज्यात डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे स्पष्ट होईल असे सांगत त्यांनी मध्यावधी निवडणुकांचीही शक्यता वर्तवली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन 100 दिवस उलटले असताना भाजप प्रदेशाध्यक्षांनी वर्तवलेल्या या भाकितामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेडगे, सभागृह नेते हेमंत रासने उपस्थित होते.

हेही वाचा - आशिष शेलारांविरोधात पुण्यात शिवसेनेची निदर्शने

चंद्रकांत पाटील म्हणाले, लोकांना माहीत आहे, कोणी कोणाचा विश्वास घात केला. ज्यांना वाटत असेल हे सरकार जास्त काळ चालेल, तर असे काही होणार नाही. त्यामुळे ठाकरे असे बोलत असतील तर नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान मध्यावधी निवडणुका झाल्या तर कोणी कोणाचा विश्वासघात केला, हे लोक ठरवतील. महाविकास आघाडीचे सरकार जेमतेम कामाला सुरुवात करत असताना पाटील यांच्या वक्तव्याने मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आता यावर महाविकास आघाडीतील नेते काय उत्तर देतात याकडेच अनेकांचे लक्ष्य लागले आहे.

हेही वाचा - पुण्यात चाललंय काय! सिंहगड रस्ता परिसरात चाळीस दुचाकी अज्ञाताने दिल्या ढकलून

Intro:...तर राज्यात मध्यवर्ती निवडणुका होतील : चंद्रकांत पाटील यांचे भाकीत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'सामना' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपने विश्वासघात केल्याचे म्हटले आहे. त्यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले. कोणी कोणाचा विश्वासघात केला हे जनता ठरवेल' असेही त्यांनी म्हटले. मात्र याच वेळी त्यांनी
राज्यात डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्यास कोणी कोणाचा विश्वासघात केला हे स्पष्ट होईल असे सांगत त्यांनी मध्यवर्ती निवडणुकांचीही शक्यता वर्तवली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन 100 दिवस उलटले असताना भाजप प्रदेशाध्यक्षनी वर्तवलेल्या या भाकितामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.

पुणे महापालिकेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेडगे, सभागृहनेते हेमंत रासने उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकांना माहिती आहे कोणी कोणाचा विश्वास घात केला.ज्यांना वाटत असेल हे सरकार जास्त काळ चालेल तर असं काही होणार नाही.त्यामुळे ठाकरे असे बोलत असतील तर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर कोणी कोणाचा विश्वासघात केला हे लोक ठरवतील. महाविकास आघाडीचे सरकार जेमतेम कामाला सुरुवात करत असताना पाटील यांच्या अंदाजाने मात्र राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. आता यावर काँग्रेस, शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस काय उत्तर देणार याकडेच बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Body:।।Conclusion:।।
Last Updated :Feb 5, 2020, 4:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.