Ajit Pawar on Seat Allocation: कुठल्याही पक्षाकडे मोदींविरोधात लढण्यासाठी ताकद नसल्याने...अजित पवारांचे जागा वाटपाबाबत स्पष्ट वक्तव्य

author img

By

Published : May 30, 2023, 9:35 AM IST

Updated : May 30, 2023, 10:28 AM IST

Etv Bharat
Etv Bharat ()

लोकसभेच्या जागा वाटपाबाबत निवडून येणे हा एकच निकष ठेवून महाविकास आघाडीला सर्व निवडणुका लढवाव्या लागतील. तसे उमेदवार द्यावे लागतील. त्यामुळे त्या त्या भागातील पक्षाची ताकदही पाहणे गरजेचे असल्याचे मत विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

कत्र लढल्याशिवाय शिंदे फडणवीस सरकारला रोखता येणार नाही

पुणे: महाविकास आघाडीतील जागावाटपावरून तिन्ही पक्ष वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. विशेषत: पुण्यातील लोकसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी आग्रही आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबतची भूमिका माध्यमांबरोबर बोलताना स्पष्ट केली आहे.

निवडणुकीतील उमेदवार कोणत्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतो आहे का, हे पाहण्यापेक्षा महाविकास आघाडीचा खासदार किंवा आमदार वाढवायचा, असा विचार महत्त्वाचा आहे. असा सगळेच पक्ष विचार करत आहेत. या विषयाची माध्यमासमोर चर्चा करण्याऐवजी एकत्रित चर्चा करावी, हे छगन भुजबळांनी मत व्यक्त केले. त्याविचाराशी सहमत असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी सांगितले.

निवडून येणारा उमेदवार देण्याची गरज : निवडणूका लढण्यासाठी सगळेजण चाचपणी करत आहेत, आम्हीही 30 व 31 मे रोजी बैठका घेत आहोत. राजकीय पक्षांनी तयारी करणे हे काम आहे. खासदारकी आमदारकी एकत्र लढवण्याविषयी आमच्या वरिष्ठांनी मत बनविले आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढल्याशिवाय शिंदे फडणवीस सरकारला रोखता येणार नाही. जिथे आमची ताकद आहे, तिथं आणखी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध लढण्यासाठी कुठल्याही एका राजकीय पक्षाकडे ताकद नाही. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार देण्याची गरज असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर सर्वच पक्ष असाच प्रयत्न करत असल्याचेसुद्धा ते म्हणाले आहेत.

सावित्रीबाईंचा पुतळा हटविल्याचा निषेध- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनामधे सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर पुतळा हटविण्यात आला आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले यापूर्वीही महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्य करण्यात आली आहेत. त्यावर आम्ही जाबही विचारला. यावेळी तर त्यांनी कहरच केला आहे. सावरकरांच्या अर्ध पुतळ्याचे उदघाटन करताना सावित्रीबाई फुले, आणि अहिल्याबाई होळकर यांचे अर्ध पुतळे हटविले. हे करायला नको होते. हे जाणीवपूर्वक होत का हे माहीत नाही. मी याचा तीव्र निषेध करतो. दिल्लीत कुस्तीपटू महिला खेळाडू आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, की ते खेळाडू आहेत, त्यांना राजकारण करायचे नाही. मला वाटलं होते, क्रीडामंत्री हा विषय मार्गी लावतील. पण तसे झाले नाही.

अतिरेक करू नये-काही धार्मिक स्थळावर ड्रेस कोड अनिवार्य करण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते पवार म्हणाले, की भारतीय पेहेराव घालून जायला काही अडचण नाही. काही मोठ्या हॉटेलमध्ये चप्पल घालून जाता येत नाही, असे चोचले ही आम्ही खपवून घेतले नाही. काही लोक उत्साहाच्या भरात संविधानाने दिलेले अधिकार विसरुन जातात. मी त्याबद्दल काही टीका टिप्पणी करणार नाही. अतिरेक करू नये एवढेच मला वाटते, असे अजित पवार म्हणाले आहेत.

मोदी सरकारला नऊ वर्ष झाले. त्यावर मार्क देण्याकरिता मी अजून शिक्षकी पेशा स्वीकारला नाही. त्यामुळे मला मार्क देता येणार नाही. पण प्रश्न सुटले का हे स्वतःच्या मनाला विचारा आणि आत्मचिंतन करा-विरोधी पक्षनेते अजित पवार

मी अजून शिक्षकी पेशा स्वीकारला नाही- नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळावर बोलताना म्हणाले, लोकप्रतिनिधींची संख्या वाढत जाणार आहे. जुन्या संसद भवनला एक परंपरा आहे. असे असताना आत्ताच्या लोकसंख्येचा विचार करता मोठे संसद भवन व्हायला हवे होते, असे माझे वैयक्तिक मत आहे. पण यातून खऱ्या अर्थाने लोकशाहीचे प्रश्न सुटावेत, वेगळे काही घडू नये, असे अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा-

  1. Ajit Pawar Vs Shambhuraj Desai : आपली तब्येत काय? आपण बोलतो किती? अजित पवारांचा शंभूराज देसाईंना टोला
  2. NCP Workers Meeting : पाटणमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा रविवारी मेळावा; अजितदादांची तोफ धडाडणार!
  3. Maharashtra Politics : महाविकास आघाडीत क्रमांक एकसाठी राष्ट्रवादीची धडपड? जाणून घ्या सविस्तर
Last Updated :May 30, 2023, 10:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.