ETV Bharat / state

पालघर : पिंजाळ, तानसा, वैतरणा नद्यांना पूर; जनजीवन विस्कळीत

author img

By

Published : Aug 4, 2019, 8:13 PM IST

Updated : Aug 4, 2019, 8:35 PM IST

पालघर :पिंजाळ, तानसा, वैतरणा नद्यांना पूर

पिंजाळ, तानसा, वैतरणा नद्यांना पूर आल्याने विक्रमगड आणि वाडा तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून या नद्या वाहणाऱ्या या नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत. मलवाडा पूल खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पाली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत परिसरात पाणी शिरले आहे.

पालघर/वाडा - पिंजाळ, तानसा, वैतरणा नद्यांना पूर आल्याने विक्रमगड आणि वाडा तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून या नद्या वाहणाऱ्या या नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत.

वाडा व विक्रमगड तालुक्याला जोडणारा मलवाडा पूल खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मलवाडा हे गावही पुराने प्रभावित झाले आहे. या गावची लोकसंख्या जवळपास दोन हजार आहे.

पालघर :पिंजाळ, तानसा, वैतरणा नद्यांना पूर

वाडा तालुक्यातील पाली येथील पिंजाळ नदीच्या काठी असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत परिसरात पाणी शिरले आहे. रविवारची सुट्टी असल्याने आज इमारतीत विद्यार्थी नव्हते. या संस्थेत 100 हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेतात.

palghar
पालघर :पिंजाळ, तानसा, वैतरणा नद्यांना पूर

वैतरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बोरेंडा व कळंभे गावातील जवळपास १८ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती वाडा तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे. त्याचबरोबर, तानसा नदीला आलेत्या पुरामुळे सुतार पाडा, काचरे पाडा, मातेरा पाडा, गवारी पाडा, खैरेपाडा, कामडी पाडा, चौधरी पाडा अशा विविध वस्त्यांमधील जवळपास ५५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Intro:वाड्यातील पाली येथील आयटीआय पिंजाळनदीच्या तडाखा
सुट्टी असल्याने विद्यार्थी सुरक्षित

पालघर (वाडा) संतोष पाटील
वाडा तालुक्यातील पाली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या इमारतीला व त्याच्या परिसराला पिंजारी नदीचा पाणी शिरले आहे.आज रविवार सुट्टी असल्याने येथे विद्यार्थी नव्हते.या 100 हूून अधिक
विद्यार्थी प्रशिक्षण घेतात
पिजाळनदीच्या नदी काठी असल्याने येथे धोका निर्माण झाला आहे.
पुर्वी याच नदी परिसरात आदिवासी आश्रमशाळा होती.ती आता या नदी काठाच्या दूरवर अंतरावर नेली आहे.पिंजाळ नदीने रौद्ररूप धारण केले आहे.याचा फटका नदीने काठच्या गावांना बसत आहे.


Body:वाड्यातील पाली येथील आयटीआय पिंजाळनदीच्या तडाखा
सुट्टी असल्याने विद्यार्थी सुरक्षित

पालघर (वाडा) संतोष पाटील
वाडा तालुक्यातील पाली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या इमारतीला व त्याच्या परिसराला पिंजारी नदीचा पाणी शिरले आहे.आज रविवार सुट्टी असल्याने येथे विद्यार्थी नव्हते.या 100 हूून अधिक
विद्यार्थी प्रशिक्षण घेतात
पिजाळनदीच्या नदी काठी असल्याने येथे धोका निर्माण झाला आहे.
पुर्वी याच नदी परिसरात आदिवासी आश्रमशाळा होती.ती आता या नदी काठाच्या दूरवर अंतरावर नेली आहे.पिंजाळ नदीने रौद्ररूप धारण केले आहे.याचा फटका नदीने काठच्या गावांना बसत आहे.

Conclusion:Ok
Last Updated :Aug 4, 2019, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.