ETV Bharat / state

विरोधकांना पोटशूळ, आंब्याच्या झाडाखालून बाभळीखाली आल्याने फडणवीसांना काटे टोचतात - अब्दुल सत्तार

author img

By

Published : Aug 20, 2021, 3:51 AM IST

Updated : Aug 20, 2021, 3:50 PM IST

अब्दुल सत्तार यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेवर सडकून टीका केली आहे. वाचा काय म्हणाले सत्तार?

अब्दुल सत्तार
अब्दुल सत्तार

पालघर - आंब्याच्या झाडाखालून बाभळीच्या झाडाखाली आल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना काटे टोचत असल्याची टीका महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. अब्दुल सत्तार पालघर जिल्हा मुख्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

अब्दुल सत्तार

'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन' असं फडणवीस म्हणाले, पण...

यावेळी अब्दुल सत्तार यांनी फडणवीसांची चांगलीच खिल्ली उडवली. 'मी पुन्हा येईन, पुन्हा येईन' असं फडणवीस म्हणाले. मात्र आम्ही न म्हणताही पुन्हा आलो', असे सत्तार यावेळी म्हणाले.

जन आशीर्वाद यात्रेवर टिका

'भाजपचा लोकांशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे त्यांना जन आशीर्वाद यात्रा करावी लागत आहे', अशी टीका सत्तार यांनी केली. दरम्यान, सध्या भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे.

'ठाकरेंच्या चांगल्या कामांमुळे विरोधकांना पोटळशूळ'

'देशातील उत्तम काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. मात्र मुख्यमंत्री चांगलं काम करत असल्याने विरोधकांचा पोटशूळ उठला आहे', असे अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

आज काय रणनीती ठरणार? सोनिया गांधींनी बोलावली विरोधकांची बैठक, ठाकरेही राहणार हजर

Last Updated : Aug 20, 2021, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.