ETV Bharat / state

कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने कसारा घाटात भीषण अपघात; २० ते २५ वाहनांना धडक

author img

By

Published : Nov 3, 2019, 12:38 PM IST

Updated : Nov 3, 2019, 12:49 PM IST

जवळपास १५ मिनिटे रस्त्यावर या ट्रकचा थरार सुरू होता. एका गॅस टँकरला धडक बसल्यानंतर अखेर हा ट्रक थांबला.

ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने कसारा घाटात भीषण अपघात

नाशिक - कसारा घाटात एका कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे या कंटेनरची रस्त्यावरून धावणाऱ्या २० ते २५ गाड्यांना धडक बसली. यामुळे वेगवेगळ्या वाहनांमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जवळपास १५ मिनिटे रस्त्यावर या कंटेनरचा थरार सुरू होता. एका गॅस टँकरला धडक बसल्यानंतर अखेर हा कंटेनर थांबला.

याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी ९ च्या सुमारास नाशिककडून मंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन निघालेल्या कंटेनरचे (एमएच ४६ एच २९८८) कसारा घाटात ब्रेक निकामी झाले. कंटेनरवरला चालकाचा ताबा सुटल्याने घाटातील २० ते २५ गाड्यांना धडक बसली. एकामागोमाग एक अनेक गाड्यांना जबर धडक दिल्याने या गाड्यांमधील अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तत्काळ इगतपुरी येथील स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात तीन महिला व दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सुमारे दोन तासानंतर घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात कसारा पोलीस प्रशासनाला यश आले. दरम्यान, संबंधित विभाग किंवा टोल वसुली करणारे कंत्राटदार यापैकी घटनास्थळावर कोणीही उपस्थित नव्हते. अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या क्रेन अतिशय जुन्या आणि कालबाह्य स्वरुपाच्या असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Intro:आज सकाळी ९ च्या सुमारास नाशिककडून
मंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन निघालेला कंटेनरचे (MH 46H 2988) कसारा घाटात ब्रेक फेल झाला, यामुळे कंटेनर चालकाला ताबा मिळवता न आल्याने घाटातील २० ते २५ गाड्यांना धडक देत अखेर एका मालवाह ट्रकला व पाठीमागे असलेल्या गॅस टँकरला शेवटची धडक देऊन,अखेर १५ मिनिटांच्या थरार नाट्यानंतर कंटेनर थांबला. मात्र
आधी एकामागोमाग अनेक गाड्यांना जबर धडक दिल्याने,वेगवेगळ्या गाड्यामधील अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले.Body:तात्काळ जखमींना जवळच्या इगतपुरी स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आले असून या अपघातत तीन महिला व दोन नागरिक गंभीर जखमी झाले असून पुढील उपचारासाठी गंभीर जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहेConclusion:समारे दोन तासानंतर घाटातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू करण्यात कसारा पोलीस प्रशासन अधिकारी-कर्मचारी यांना यश आले.दरम्यान,संबंधित विभाग किंवा टोल वसुली करणारे,कंत्राटदार यांचे कोणीही उपस्थित नव्हतेच पण घाटातील सर्व गाड्या बाजूला करण्यासाठी ज्या क्रेन उपलब्ध करण्यात आल्या त्या अतिशय जुन्या आणि कालबाह्य,डबड्या स्वरूपाच्या असल्याने,प्रवासामध्ये तीव्र नाराजी
Last Updated :Nov 3, 2019, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.