Onion Farmers Aggressive : कांदा प्रश्नावर राष्ट्रवादीकडून रास्तारोको; विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक

author img

By

Published : Sep 21, 2022, 2:27 PM IST

Onion Farmers Aggressive

नाशिकच्या सटाणा तालुक्यात कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी आक्रमक झाले ( Onion farmers aggressive ) आहेत. त्याशिवाय विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ( ncp) सटाणा बस स्थानकाजवळ रास्ता रोको करण्यात ( Farmers agitation for various demands ) आला. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.

नाशिक - नाशिकच्या सटाणा तालुक्यात कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी आक्रमक झाले ( Onion farmers aggressive ) आहेत. त्याशिवाय विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ( ncp) सटाणा बस स्थानकाजवळ रास्ता रोको करण्यात ( Farmers agitation for various demands ) आला. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.

कांदा प्रश्नावर राष्ट्रवादीकडून रास्तारोको

या आहेत शेतकरी आंदोलकांच्या मागण्या

  • कवडी मोल भावाने विकल्या जाणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्यातिला चालना देण्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून विक्री केलेल्या कांद्याला ५०० रुपये प्रमाणे अनुदान जाहीर करावे. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
  • महाराष्ट्रात लाखो कोटींचा उद्योग सुरू करून तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा वेदांत फ़ॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्र सोडून गुजरातला गेल्याने ( Foxconn project gone from Maharashtra )शेतकरी संतप्त झाले आहेत. हे वृत्त म्हणजे महाराष्ट्र राज्य- सरकारचे अपयश असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे याचा निदर्शन आंदोलन करून निषेध केला. केंद्र सरकारकडे मध्यस्थी करून हा वेदांत फ़ॉक्सकॉर्न प्रकल्प महाराष्ट्रातच आणावा अशी मागणी केली.
  • पावसाने शेतपिकांचे नुकसान झाल्याने कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. नुकसानीचे त्वरित पंचनामे करावे व शेतकऱ्यांना ५० हजार रुपये एकरी नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारने मदत करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
  • लंपी आजारामुळे शेतकऱ्यांची गुरे मरत आहेत. त्यांना सरकारने त्वरित भरपाई द्यावी तसेच या आजाराची लस सरकारतर्फे मोफत उपलब्ध करून द्यावी.

  • जिल्हा नियोजन मंडळाच्या मंजूर कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने नाशिक जिल्ह्यातील सर्व कामे व पावसाळ्यातील कामे बंद पडल्याने नागरिकांचे हाल होत आहेत या सर्व कामांची स्थगिती तात्काळ उठवण्यात यावी व त्वरित पालकमंत्री नियुक्त करून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक कामांना सुरुवात करावी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.