येवला ( नाशिक) येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ शिवारात गांजाची शेती करणाऱ्या तिघांना येवला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कांद्याच्या शेतात गांजाची झाडे
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव रेपाळ शिवारात कांद्याच्या शेतामध्ये गांजाची काही झाडे असल्याची गुप्त माहिती येवला पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकला.
तीन आरोपींना अटक
दरम्यान छापा टाकल्यानंतर पोलिसांना कांद्याच्या शेतात 8 गांजाची झाडे आढळून आली. या झाडाचे वजन तीन किलो 100 ग्रॅम एवढे असून, किमंत अंदाजे 15 हजार एवढी आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - नागपुरात भाजपचे चारही आमदार जिल्हाधिकारी कार्यालयात धरण्यावर