ETV Bharat / state

CM Eknath Shinde : 'फडणवीस राजकारणातील निष्कलंक माणूस; सकाळचा नऊचा भोंगा बंद करा'

author img

By

Published : Jul 15, 2023, 2:52 PM IST

Updated : Jul 15, 2023, 3:51 PM IST

अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्याने याचा आम्हाला फायदा होणार आहे. विरोधकांना आता वाटत असेल की तिघांचे सरकार कसे चालणार? पण आम्ही तिघेही समजूतदार आहोत. देवेंद्र फडणवीस हा मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून स्विकारले आहे. तसेच अजित पवार हे देखील दिलदार असून, त्यांनीही उपमुख्यमंत्रीपद स्विकारले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच नऊ वाजताचा भोंगा दाखवणे बंद करा, असा टोला राऊतांना मारला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

नाशिक - 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये आले होते. यावेळी तिघांनीही विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहिले आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण राज्याचा विकास करत आहोत. याच विकासाला पाठबळ देण्यासाठी आता अजित पवार आपल्यासोबत आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

फडणवीस राजकारणातील निष्कलंक माणूस - राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचा विडा महायुतीच्या सरकराने घेतला आहे. आता राष्ट्रवादीही आमच्यासोबत आल्याने हे सरकार मोठ्या गतीने काम करत आहे. आता जनता मोठी सुज्ञ आहे. घरी बसणाऱ्या नेत्यांना जनता आता घरी बसवते, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न केला आहे. उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील खरे निष्कलंक माणूस आहेत. मात्र, काहीजण त्यांना कलंक लावतात. त्यासाठी मन मोठे असावे लागते. खोट्या मनाच्या माणसांकडून ती अपक्षा केली जाऊ शकत नसल्याचा टोलाही मुख्यमंत्री यांनी ठाकरेंना लगावला आहे.

आघाडी सरकारने प्रकल्प थांबवले - महायुतीचे सरकार हे अधिक वेगवान सरकार आहे. राज्याचा सर्वांगीण विकास साधता येईल यासाठी आम्ही तिघेही जोराने काम करणार आहोत. मागील सरकारने अडीच वर्षात सर्व कामे ठप्प पाडली होती. मेट्रो, समृद्धी, कोस्टल रोड असे ्नेक महत्तवाचे प्रकल्प मागील सरकारने थांबवले होते. ते सर्व प्रकल्प आमचे सरकार आल्यानंतर लगेच मार्गी लावले आहेत. त्यामुळे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना टोला मारला आहे.

महाविकास आघाडीची वज्रमूठ फूस झाली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्याविरोधात सगळ्या विरोधी पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र, ही वज्रमूठ सगळी झूठ ठरली आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांची मोठी वाताहत झाली. पंतप्रधानांच्या विरोधात एक नेता उभा राहू शकत नसल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.

हेही वाचा -

  1. Ajit Pawar on Sharad Pawar : शरद पवार श्रद्धास्थान, प्रेरणास्थान; त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात - अजित पवार
  2. Ajit Pawar Vande Bharat Express : अन् अजित पवारांनी केला वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास; पाहा व्हिडिओ
  3. Shasan Aapya Dari : पालकमंत्र्यांची आमदारांना साद शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 20 लाख देण्याची विनंती
Last Updated : Jul 15, 2023, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.