नंदुरबार - गेल्या सहा महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेची एकही बैठक न झाल्याने वयोवृद्ध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बैठक न झाल्याने नवीन लाभार्थ्यांची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक निराधार ज्येष्ठ नागरिकांना तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पालकमंत्र्यांकडे साकडे घातले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची एकही बैठक न झाल्याने वयोवृद्ध नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. बैठक न झाल्याने नवीन लाभार्थ्यांची निवड होऊ शकली नाही. त्यामुळे वयोवृद्धांनी पालकमंत्र्यांकडे साकडे घातले होते. त्यानुसार पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजने अंतर्गत सहा महिन्यात आलेल्या सर्वच प्रकरणाचा निपटारा करण्याचा आदेश बैठकीत अधिकाऱ्यांना दिला आहे. गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचा आदेश दिल्याने निराधार ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.