ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये वातावरणातील बदलामुळे मिरची उत्पादन घटले

author img

By

Published : Jan 16, 2020, 12:47 PM IST

nandurbar
मिर्ची

नंदुरबार बाजार समितीत मागील वर्षी १४ जानेवारीपर्यंत ६० हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी केली गेली होती. मात्र, या वर्षी होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे तब्बल एक महिना उशिरा मिरची खरेदी सुरू झाली असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नंदुरबार- देशातील सर्वात मोठ्या मिरचीची बाजार पेठ आसलेल्या नंदुरबार बाजार समितीत आतापर्यंत 40 हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली आहे. बाजारात दररोज २ ते ३ हजार क्विंटलची आवक होत आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मिर्ची खरेदीत घट झाली आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वातावरणातील बदलाचा फटका मिरचीला बसल्यामुळे उत्पादन घटल्याची माहिती समोर आली आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

नंदुरबार बाजार समितीत मागील वर्षी १४ जानेवारी पर्यंत ६० हजार क्विंटल लाल मिरचीची खरेदी केली गेली होती. मात्र, या वर्षी होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे तब्बल एक महिना उशिरा मिरची खरेदी सुरू झाली असल्याचे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- नंदुरबार जिल्हा परिषद ; भाजपच्या गटनेतेपदी कुमुदिनी गावित

Intro:नंदुरबार - देशातील सर्वात मोठी मिरची ची बाजार पेठ आसलेल्या नंदुरबार बाजार समितीत आता पर्यंत 40 हजार क्विंटल लाल मिरची ची खरेदी झाली आहे. दररोज दोन ते तीन हजार क्विंटल ची आवक होत आहे. मात्र गेल्या वर्षी 14 जानेवारी पर्यंत 60 हजार क्विंटल मिरची खरेदी झाली होती. मोठ्या प्रमाणात होणारे वातावरणातील बदलाचा फटका मिरची उत्पादनाला बसला आहे मागच्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी आता पर्यंत 20 हजार क्विंटल आवक ची तफावत आहे...
Body:हिरवे हिरवे गार गालिचे – हरीत तृणांच्या मखमालीचे..

हिरवे हिरवे गार गालिचे...हरीत तृणांच्या मखमालीचे, ही कविता आपण सर्वांनी एकली असेल, मात्र नंदुरबार शहरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वत्र लाल रंगाचे दर्शन होईल. आपल्याला वाटेल की, कुणाच्या स्वागतासाठी लाल रंगाचे गालिचे टाकले आहेत. मात्र त्या आहेत बाजार समितीत खरेदी केलेल्या मिरची वळविण्या च्या पथराऱ्या...
नंदुरबार बाजार समितीत मागील वर्षी 14 जानेवारी पर्यंत 60 हजार क्विंटल लाल मिरची ची खरेदी केली गेली होती. मात्र या वर्षी होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे तब्बल एक महिना उशिरा मिरची खरेदी सुरू झाली असल्याचं बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Byte
योगेश अमृतकर
सचिव - कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबार
Conclusion:2009 खान्देश पॅकेजमध्ये नंदुरबार येथे चिली पार्कची घोषणा करण्यात आली होती. ती कागदावरच राहिली असली तरी नंदुरबार शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वागत या "रेड कार्पेट" ने केले जाते...
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.