ETV Bharat / state

Sharad Pawar on Savarkar : स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वीर सावरकरांचे योगदान नाकारता येणार नाही; शरद पवारांचे मोठे विधान

author img

By

Published : Apr 1, 2023, 8:53 PM IST

Updated : Apr 1, 2023, 9:10 PM IST

वीर सावरकर हा आज राष्ट्रीय विषय नसला तरी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी वीर सावरकरांचे योगदान नाकारता येणार नसल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. नागपूर येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वीर सावरकरांकडे सोशल आणि सायंटिफिक दृष्टी होती. देशाच्या समोरील इतर महत्त्वाचे विषय बाजूला सारून सावरकरांचा विषय पुढे केला जात असल्याचे ते म्हणाले.

Sharad Pawar On Veer Sawarkar
वीर सावरकर

शरद पवार स्वातंत्र्यवीर सावरकरांसह इतर मुद्द्‌यांवर बोलताना

नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु, वारंवार अशी वक्तव्ये करून समाजात कटुता निर्माण कुणीही करू नये, असे शरद पवार म्हणाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा एकत्र होणार नाहीत, असे माझे वैयक्तिक मत आहे. 2024 ची निवडणूक भाजप धार्मिकेतेवर लढणार ही शक्यता नाकारता येत नाही. राम मंदिराचा विषय पुढे करून प्रचार करेल. मात्र, आम्ही राष्ट्रीय आणि स्थानिक मुद्यावरच निवडणूक लढू असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. भाजप लोकसभा मिशन 400 हे आम्ही ऐकत असतो. आम्ही आमची तयारी करतो आहे पण जाहीरपणे बोलत नाही.


ऊस उत्पादनात नंबर वन करायचं आहे: ऊसाच्या उत्पनात जगात भारत क्रमांक एक वर तर भारतात ऊस उत्पादनात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देणारे पीक आहे. या क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे उप केंद्र नागपूर व्हावे असे मला वाटत होते. गडकरींची देखील तशीच इच्छा आहे. त्याकरिता आम्ही आवश्यक जमीन खरेदी करून लवकरात लवकर संशोधन सुरू व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील एक ते दीड वर्षांत इन्स्टिट्यूटची उभारणी करू आणि 50 एकर जागेवर ऊसाचे पीक घेऊन ते पीक कसे घ्यावे याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणार असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत. ऊसाच्या मोलासिस पासून इथेनॉल तयार होत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल.

ऊस, सोयाबीन पिकांवर लक्ष केंद्रित: सध्या आम्ही दोन पिकांवर लक्ष केंद्रित केलेले आहे. मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात उत्तम ऊस होतो. त्याभागात कारखानदारी उभी झाली. ज्यामुळे शेतकरी आत्महत्या कमी झाल्या आहेत. विदर्भात सुद्धा हेच काम करावे लागेल. या संदर्भात गडकरी आणि माझी चर्चा होत असते. विदर्भातील शेतकरी सोयाबीनचे पीक उत्तमरित्या घेतात. विदर्भात ऊस आणि सोयाबीनचे कॉम्बिनेशन साधण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठीच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सुरू होत आहे. त्याचबरोबर संत्रा पिकाला संजीवनी देण्यासाठी काम करण्याची गरज आहे.


केंद्र सरकारच्या धोरणांचा फायदा नाही: केंद्र सरकारच्या धोरणांचा अनुकूल फायदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. कापसाला भाव मिळत नाही. निर्यात धोरण फारसे अनुकूल नाही. त्यामुळे कापसाचे अर्थकारण अडचणीत येत असल्याचे ते म्हणाले आहेत. भारतीय जनता पक्षाविरुद्ध सर्व विरोधी पक्ष एकत्रित यावे ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रीय पक्षांना एकत्रित करण्यासाठी चर्चा सुरू आहे; पण हा प्रयत्न केवळ चर्चेच्या स्टेजवरच आहे, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Navjot Singh Sidhu released : तब्बल दहा महिन्यानंतर नवजोत सिंग सिद्धू जेलबाहेर; कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

Last Updated : Apr 1, 2023, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.