ETV Bharat / state

Investigation of Subhash Desai : सुभाष देसाई यांच्या भूखंड घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी - उदय सामंत

author img

By

Published : Dec 29, 2022, 5:29 PM IST

Updated : Dec 29, 2022, 7:00 PM IST

उदय सामंत
उदय सामंत

माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई ( Former Industries Minister Subhash Desai ) यांच्या कथित भूखंड घोटाळ्याची ( Subhash Desai land scam ) एसआयटीमार्फत चौकशी ( Investigation into Subhash Desai plot scam ) करणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत ( Industries Minister Uday Samant ) यांनी विधानसभेत केली.

नागपूर - माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई ( Former Industries Minister Subhash Desai ) यांच्या भूखंड घोटाळ्याची ( Subhash Desai land scam ) एसआयटी मार्फत चौकशी ( Investigation into Subhash Desai plot scam ) करण्यात येईल. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याची विधानसभेत घोषणा केली. औरंगाबाद जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये घोटाळा ( Scam in MIDC in Aurangabad district ) केल्याचा त्यांच्यावर आरोप आहेत. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप सुभाष देसाईंवर ( Subhash Desai ) करण्यात आले होते. याची संपूर्ण चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येणार आहे.

कोट्यवधी रुपयांचा घोटाळा - औरंगाबाद MIDC तील ५२ प्लॉट्सचे स्टेटस बदलून त्याचा वापर व्यवसायीक व निवासी उद्दिष्टांसाठी करण्यात येत असून फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्योगमंत्री असलेले सुभाष देसाई यांंनी यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलिल यांनी केला आहे. राज्यातल्या चार मंत्र्यांवर एकीकडे आरोप होत असतानाच जलील यांनी सुभाष देसाई यांच्यावर १२० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी लँड कन्वर्जनच्या नावाखाली औरंगाबाद मध्ये ५२ प्लॉट रूपांतरीत केल्याचा आरोप केला आहे.

चिकलठाणा इंडस्ट्रियल भागात ५२ प्लॉटचा भ्रष्ट्रचार - औरंगाबाद येथील चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत (Chikalthana MIDC) उद्योगांसाठी राखीव असलेल्या प्लॉटचे आरक्षण बदलून त्याचे व्यवसायीक (Commercial) व निवासी (Residential) उद्दिष्टांसाठी वापर करून शिवसेना नेते, राज्याचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला असे इम्तियाज जलिल म्हणाले होते. बुधवारी सुभेदारी विश्राम गृहवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, चिकलठाणा इंडस्ट्रियल भागात ५२ प्लॉटचा वापर बदलण्यात आला आहे. आणि यातील सगळ्यात मोठा एजंट हा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मुलगा होता. त्यामुळे याबाबत एसआयटी स्थापन करून चौकशी केली तर सुभाष देसाई तुरुंगात असतील, असा दावा जलील यांनी केला आहे.

दरम्यान, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या कथित भूखंड घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. औरंगाबाद जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहेत. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप सुभाष देसाईंवर करण्यात आले होते. याची संपूर्ण चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येणार आहे.

Last Updated :Dec 29, 2022, 7:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.