ETV Bharat / state

Devkinandan Thakur: देवकीनंदन ठाकूर यांचे 'त्या' विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले,' पुढील पंचवीस वर्षानंतर भारत..

author img

By

Published : Feb 20, 2023, 9:04 PM IST

कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. पुढील पंचवीस वर्षानंतर भारत सेक्युलर देश राहू शकेल का?, यामुळे सनातनींनी किमान चार ते पाच मुलांना जन्माला घालावे, असे ठाकूर यांनी सांगितले. ते नागपूरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Devkinandan Thakur
कथावाचक देवकीनंदन ठाकुर

कथावाचक देवकीनंदन ठाकूर पत्रकार परिषदेत बोलताना


नागपूर: आजपासून पुढील दहा वर्षात जर भारताला सनातन राष्ट्र घोषित न केल्यास पुढील पंचवीस वर्षानंतर भारत सेक्युलर देश राहू शकेल का? असा प्रश्न कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी उपस्थित केला. सनातनींनी किमान चार-पाच मुले जन्माला घालावीत, असे वादग्रस्त विधान केले आहे आहे. 22 फेब्रुवारी ते 01 मार्च 2019 या कालावधीत रेशमबाग मैदान, नागपूर येथे कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देवकीनंदन ठाकुर यांचे वक्तव्य: ते पुढे म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात जास्त आक्रमक सनातनींवर झाले आहे. दुसऱ्या धर्मात चार बायका चाळीस मुले यावर कुणीही आक्षेप घेत नाही. त्यामुळे जोपर्यंत जनसंख्या नियंत्रण कायदा अस्तित्वात येत नाही तो पर्यंत सनातनींनी किमान चार-पाच मुले जन्माला घालावे, असे वादग्रस्त वक्तव्य कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी केले आहे.

सनातन बोर्ड स्थापन करावा: ज्याप्रमाणे देशात वफ्त बोर्ड अस्तित्वात आहे, त्याचप्रकारे केंद्र सरकारने सनातन बोर्डची स्थापना करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे, याकडे केंद्र सरकारने गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी केली आहे. आपला भारत देश सनातन धर्माला मानणारा राहिलेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सेक्युलर झालो आहे, असेही ते म्हणाले.


आजही हिंदू अल्पसंख्याक: भारतातील अनेक राज्यात आजही हिंदू समाज अल्पसंख्याक म्हणून आहे. त्यामुळे लव-जिहाद धर्मपरिवर्तन सारख्या समस्या निर्माण होत आहेत. ज्या राज्यात हिंदू अल्पसंख्याक आहे तिथे कोणत्याही सोयी सुविधा देखील दिल्या जात नाही. या उलट आम्हाला अल्पसंख्याक सुद्धा मानले जाते नसल्याचेही ठाकूर म्हणाले आहेत.



राष्ट्र होणे गरजेचे: एक देश, एक कायदा, एक पत्नी आणि दोन बच्चे या देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्र होणे गरजेचे आहे. आपल्या सुरक्षेसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पुढील पंचवीस वर्षांनंतर मला आणि तुम्हाला रडत बसावे लागेल,पुढची पिढी शिव्या घालतील, असे देवकीनंदन ठाकूर महाराज म्हणाले आहेत.

हेही वाचा: Devkinandan Thakur : 'प्रत्येक हिंदूने पाच मुलांना जन्म द्यावा.. लोकसंख्या नियंत्रण कायदा नसल्याचा फायदा घ्या..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.