ETV Bharat / state

विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार - उद्धव ठाकरे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 8:20 PM IST

Updated : Jan 10, 2024, 8:28 PM IST

Shiv Sena MLA disqualification
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात आम्ही सुप्रिम कोर्टात जाणार आहोत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादा सोडल्या, अशा आशयाच्या शब्दांत आमदार अपात्र प्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल आल्यानंतर आता विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

मुंबई Uddhav Thackeray : गेल्या अनेक दिवसांपासून चाललेला शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज बुधवार (१० जानेवारी)रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय. त्यामध्ये खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असून, दोन्ही गटाचे आमदार पात्र असल्याचा निर्णय दिलाय. त्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. त्यामध्ये त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंची होऊच शकत नाही. त्यांचं आणि शिवसेनेचं नातं तुटलय असं म्हणत शिवसेना आमचीचं असा पुन्हा एकदा दावा केलाय. तसंच, हा निर्णय आपल्याला मान्य नसून आपण सुप्रीम कोर्टात जाणार आहोत असंही ठाकरे यांनी जाहीर केलंय.

  • #WATCH | Former Maharashtra CM Uddhav Thackeray says, "We will go among the people...We have been going among the people & we will fight together along with the people of the state..." pic.twitter.com/WJweypm76S

    — ANI (@ANI) January 10, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुप्रीम कोर्टाचा अपमान : जर न्यायाधीश आरोपीची भेट घेत असतील तर यांच्याकडून कशी अपेक्षा करणार असं म्हणत, हा निर्णय म्हणजे मॅच फिक्सींग होती असा घणाघाती आरोपही उद्धव ठाकरे यांनी केलाय. जर घटना ग्राह्य धरत नाहीत तर आम्हाला अपात्र का केलं नाही, असा उलट प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी केलाय. तसंच, या निर्णयाने नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचा अपमान केलाय असं म्हणत, यांनी स्वत:च्या अंगावर संकट ओढावून घेतलंय. तसंच, लोकही मोठ्या प्रमाणात संतापले असून, ही लढाई आता लोकांमध्ये होईल. लोकच यांना धडा शिकवतील असंही ठाकरे यावेळी म्हणालेत.

संजय राऊत कायम म्हणाले : विधानसभा अध्यक्षांनी निकाल जाहीर करताच संजय राऊत यांनी सामना कार्यालयाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न सुरू असून, दिल्लीतील ताकद यासाठी दुर्दैवानं मराठी माणसाचाच वापर करत आहे. एका मराठी माणसानेच शिवसेना संपवण्यात हातभार लावला. शिवसेना संपवण्याचा भाजपाचा कट असून हे त्यांचं जुनं स्वप्न होतं. जनतेच्या मनामनात असलेली शिवसेना अशी संपणार नाही. आजचा निकाल अंतिम नाही, आम्ही सर्वोच्च न्यायालयात आवाज उठवूच. पण एकनाथ शिंदेंना जनता कधीच माफ करणार नाही, त्यांनी केलेलं पाप कधीच पुसणार नाही, असंही राऊतांनी म्हणालेत.

नाना पटोलेंची प्रतिक्रिया : गुजरात वरून आलेली स्क्रिप्ट विधानसभा अध्यक्षांनी वाचून दाखवली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आजचा निकाल हा अत्यंत धक्कादायक असा आहे. लोकशाहीची पायमल्ली करणारा हा निकाल आहे. आजच्या निकालाची स्क्रिप्ट ही निश्चितच गुजरात वरून लिहून आली होती की काय अशी चर्चा आता जनतेत सुरू झाली आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय.

Last Updated :Jan 10, 2024, 8:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.