ETV Bharat / state

केजरीवालांनी 'जन की बात' देशाला दाखवून दिली, ठाकरेंचा भाजपला टोला

author img

By

Published : Feb 11, 2020, 4:16 PM IST

केजरीवालांनी 'जन की बात' देशाला दाखवून दिली
केजरीवालांनी 'जन की बात' देशाला दाखवून दिली

दिल्लीतील जनतेने आता देशात 'मन की बात' नव्हे तर 'जन की बात' चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून भाजपने सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ूसमोर टिकाव लागला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई - दिल्ली विधानसभेच्या निकालावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. आपण म्हणजे देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला असल्याचे त्यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्लीतील जनतेने 'मन की बात' नव्हे तर 'जन की बात' आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून भाजपने सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाडूसमोर टिकाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून अरविंद केजरीवाल यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना करत स्थानिक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणला. मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुनसुद्धा अरविंद केजरीवाल यांना ते पराजीत करू शकले नाहीत, असे ठाकरे म्हणाले.

"दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभा राहिली आणि जनतेने लोकशाहीवरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा" असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Intro:Body:mh_mum_kejriwal_cm_ut_mumbai_7204684


अरविंद केजरीवाल यांनी जन की बात देशाला दाखवून दिली
- मंत्री उद्धव ठाकरे यांचा दिल्ली निकालावरून भाजपला टोला

आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोड़ला
असून दिल्लीतील जनतेने मन की बात नव्हे तर जन की बात आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील विधानसभा निकालानंतर दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले,तथाकथीत राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यानी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही , बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून , अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानीक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल याना ते पराजीत करू शकले नाहीत , दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे ऊभी राहिली आणि जनतेने लोकशाही वरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोड़ला असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मन:पूर्वक अभिनंदन . दिल्लीतील जनतेने मन की बात नव्हे तर जन की बात आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथीत राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यानी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही , बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून , अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानीक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल याना ते पराजीत करू शकले नाहीत , दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे ऊभी राहिली आणि जनतेने लोकशाही वरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोड़ला , दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसैनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो." असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.